
फोटो सौजन्य - Social Media
काय लिहलं आहे पोस्टमध्ये?
अभिनेत्याने पोस्ट करताना नमूद केले आहे की, “Sunetra Pawar वहिनी, Ajit Pawar दादांनी उभारलेला भव्य वारसा आजही जनतेच्या मनात तितक्याच ताकदीने जिवंत आहे आणि बारामतीतून मिळालेलं प्रेम हे त्याचं सुंदर प्रतीक ठरत आहे. तुमचा हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या राजकारणात अभिमानाचा नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर आलेली ही जबाबदारी तुमच्या नेतृत्वक्षमतेची आणि जनतेच्या विश्वासाची मोठी पावती आहे. दादांची विकासकामं, लोकांप्रती असलेलं प्रेम आणि प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द यांनी त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नेता बनवलं. आज जनतेने त्यांच्या अर्धांगिनीवर दाखवलेला विश्वास हा त्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान मानला जात आहे. तुमच्यामध्येच त्या वारशाला पुढे नेण्याची ताकद असल्याची भावना लोकांच्या मनात दिसून येते. महाराष्ट्रासाठी हा एक नवा, सकारात्मक आणि सुवर्णकाळ ठरो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! “कारण, सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!”
बारामती पोटनिवडणुकीत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले होते. पण 22 उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार न घेण्याचा विचार केला, तरीही शेवटी सुनेत्रा पवारांनीच या निवडणुकीत झेंडा रोवला आहे. त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले आहेत.
विजयानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. रंग उधळणे तसेच मिरवणूक काढून जल्लोष करण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिला आहे.