"तुम्ही टीका करत राहा, आम्ही...", निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराची पोस्ट
‘चला हवा येऊ द्या’ या टेलिव्हिजन कॉमेडी शोवरून अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात सध्या जोरदार वाद सुरु आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘चला हवा येऊ द्या’चा दुसरा सीझन येणार आहे. या नव्या सीझनचं होस्टिंग निलेश साबळे करणार नसून अभिजित खांडकेकर करणार आहे. ‘चला हवा येऊ द्या २’मधून निलेश साबळेने एक्झिट घेतल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी निलेशवर डोक्यात हवा गेली, त्यामुळे झी मराठीने डच्चू दिला यांसह अनेक त्यांनी आरोप केले.
भारतातील सर्वात महागडा सिनेमा, १६०० कोटींचं बजेट; चित्रपटाचा निर्माता कोण?
राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या टीकेवर निलेशने व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आपली मत मांडताना दिसत आहेत. त्यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’मधील एका कलाकार पोस्टच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या काही एपिसोडमध्ये अभिनेता अभिषेक बारहाते- पाटील दिसला होता. त्यामध्ये त्याने किम जोंग उनची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना फार आवडली होती. आता शरद उपाध्ये- निलेश साबळेच्या वादात अभिषेकने उडी घेतली असून त्याने निलेश साबळेची बाजू घेतली आहे.
कपिल शर्माने पत्नीसोबत सुरू केला नवीन व्यवसाय, परदेशामध्ये केला श्रीगणेशा
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता अभिषेक बारहाते- पाटील काय म्हणाला?
प्रति
सन्मा.शरद उपाध्ये साहेबआज तुमची एक पोस्ट वाचली.
डॉक्टर निलेश साबळे यांच्याबद्दलची ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली.त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.“डोक्यात हवा गेलीय”,
“याला आपणच मोठं केलं…”
“सगळा अभिनय फक्त स्वतःचा शोभा वाढवायला…”
असं किती काही वाचायला मिळालं आणि खरं सांगायचं, तर राग आला. पण त्याहून जास्त खंत वाटली.
कारण तुम्ही टीका केली त्या माणसावर, ज्यांनी लोकांमध्ये चेहरा नसलेल्या, आवाज नसलेल्या, नाव नसलेल्या मुलांना नाव दिलं, आवाज दिला, आणि स्टेज दिला.हो, मी गावाकडचा आहे.
शुद्ध भाषेचा अभाव बोलण्याची भीती होती. अभिनय माहित नसलेला पण तेव्हा कोणीतरी होता ज्याने आमच्यासारख्या गावठीवर विश्वास ठेवला. आम्ही काहीतरी करू शकतो, हे पहिल्यांदा दाखवून दिलं.डॉक्टर निलेश साबळे आमचे मार्गदर्शक, आमची ओळख.
ज्या शोबद्दल आपण बोलला चला हवा येऊ द्या विषयी
शून्य जाहिरातीतून, शून्य गॉसिपमध्ये राहून… फक्त कामावर विश्वास ठेवत तो शो अविरतपणे चालवला तो साबळे सरांनी आणि बघता बघता,
तो कार्यक्रम त्याने १० वर्षे टिकला.
लोक मराठी शो बदलून पाहायचे,
हिंदी कलाकार मराठीत यायला भाग पडले.पहिला मराठी शो ज्याने हिंदी कलाकार मराठी स्टेज वर आणले.आणि एक दिवस असा आला की –
‘चला हवा येऊ द्या शो’ फक्त मुंबईपुरती मर्यादित गोष्ट राहिली नाही.कोणी तरी म्हणालं – “स्टारडम डोक्यात गेलंय.”
हो, गेलंय कदाचित –
पण ते डोक्यात गेलेलं ‘हवा’ नाही –
तर अनुभव, संघर्ष, आणि हजारोंच्या पाठीशी उभं राहिलेलं आत्मभान आहे.आमच्यासारख्या पोरांना लोक विचारायचे – “तू कुठून आलास?”
आज विचारतात – “तू त्या शोमध्ये होता ना?”
ही ओळख फुकट मिळत नाही –
ही ओळख मिळवून द्यायला कोणीतरी आयुष्य घालवतं लागतं.आणि म्हणूनच,
कोणीही काहीही बोलेल, तरी सत्य बदलत नाही.
ज्यांनी निर्माण केलं, त्यांचं योगदान काही पोस्टने मिटत नाही.हे सरांचं कौतुक नाही, हे आम्हा सर्वांचं उत्तर आहे.
कारण जिथे आमचा आवाज थांबतो,
तिथे त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं.
आणि आज कोणी त्यांच्यावर बोट दाखवत असेल,
तर आम्ही शंभर आवाजांनी त्यांचं नाव पुन्हा पुन्हा उच्चारू.आमचं शिक्षण, आमचा आत्मविश्वास, आमचं ओळख –
किती मोलाचं असतं हे तुम्हाला समजणार नाही.
कारण तुमचं सगळं काही तयार होतं.
आमचं तर त्यांच्यामुळे सुरू झालं.तुम्ही टीका करत राहा, आम्ही आदर करत राहू.
कारण तुम्ही नाव घेतलं, आणि आम्ही नाव कमावलं – त्यांच्या बरोबर उभं राहून.एक गावातला मुलगा
(जो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलाय-एका माणसामुळे)