Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

बॉलीवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री-पत्नी पल्लवी जोशी हे दाम्पत्य सध्या चर्चेत आहे. कारण आहे त्यांनी मराठी जेवणावर केलेली खिल्ली. यावर अनेक मराठी कलाकार आपला संताप व्यक्त करत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 20, 2025 | 04:21 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी पुन्हा चर्चेत
  • वरण भाताविषयी वादग्रस्त वक्तव्य
  • पुष्कर जोगने व्यक्त केला संताप
बॉलीवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पत्नी पल्लवी जोशी हे दोघेही सध्या चर्चेत आहे. कारण आहे त्यांनी मराठी जेवणावर केलेली खिल्ली. ‘मराठी लोकांचं जेवण म्हणजे गरीबांचं जेवण, शेतकऱ्यांचं जेवण’, असं वक्तव्य विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत केले आहे. त्यावर पल्लवी हसताना दिसली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांची संतापाची लाट उसळली. आणि अनेक मराठी कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

या वक्तव्यावर मराठी कलाकार एकामागून एक टीका करत आहेत. आधी दिग्दर्शक महेश टिळेकर, अभिनेत्री नेहा शितोळे यांनी प्रतिक्रिया दिली. आता अभिनेता पुष्कर जोगही पुढे आला. त्यानेही स्वतःचा संताप व्यक्त केला. अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि विवेक अग्निहोत्रींवर चांगलीच टीका केली आहे.

पुष्कर जोगने व्यक्त केला संताप
पुष्कर जोगने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेर करून लिहिले की, “सगळे महाराष्ट्रात येतात, छान काम करतात, पैसे कमावतात, पण मराठीला मान कोणी देत नाही. ह्याचं वाईट वाटतं. ह्यावर कोणाही बोलत नाही अजून 10-12 वर्षांनी मराठी माणूस शिल्लक राहील का, ही भीती वाटते. या कमेंटचा जाहीर निषेध. एवढी गरिबी आहे म्हणूनच अख्ख्या देशाचा भार मुंबई आणि महाराष्ट्राने उचललाय…असो…”. असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

तसेच, आता विवेक–पल्लवी यांच्या या व्हिडीओवर नेटकरी जोरदार टीका करत आहेत. “मराठी जेवणाची टिंगल करून प्रसिद्धी मिळवायची ही पद्धत चुकीची आहे”, असं मत अनेकांनी मांडले आहे. तर, काहींनी पल्लवी जोशींना उद्देशून “तुम्ही स्वतः मराठी आहात, तरी मराठी संस्कृतीची थट्टा करता?” असा सवालही केला आहे.

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

काय म्हणाले विवेक अग्रिहोत्री?
वरणभाताबद्दल बोलताना विवेक अग्रिहोत्री म्हणाले, ‘माझ्यासाठी वरण भात हा एकदम कल्चरल शॉक होता, इतके साधे जेवण! मला वाटायचे हे गरिबांचे जेवण आहे, पण नंतर माझ्या लक्षात आले की, वरण भात हे अत्यंत पौष्टिस आणि साधे जेवण आहे’, यावर पत्नी पल्लवी जोशीने किस्सा सांगत म्हटले की, पहिल्यांदा वरणभात खाल्ल्यावर विवेकच्या चेहऱ्यावरील हावभाव हे अत्यंत विचित्र होते आणि त्याने यात मसाला कुठे आहे? असा प्रश्न विचारला होता. मात्र या सगळ्या गप्पांवर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.

 

Web Title: Pushkar jog got angry on vivek agnihotri said they dont respect marathi while living in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • entertainment
  • pushkar jog
  • vivek agnihotri

संबंधित बातम्या

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा
1

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं
2

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं

साई आणि जुनैदच्या ‘एक दिन’मधील ‘कोनिचिवा’ गाणं ठरलं चाहत्यांची पहिली पसंत; चित्रपटाची उत्सुकता शिगेला
3

साई आणि जुनैदच्या ‘एक दिन’मधील ‘कोनिचिवा’ गाणं ठरलं चाहत्यांची पहिली पसंत; चित्रपटाची उत्सुकता शिगेला

“लेजेंड” म्हणत ‘धुरंधर 2’ दिग्दर्शक आदित्य धरने केले प्रभासचे कौतुक; पॅन-इंडिया स्टारडम पुन्हा चर्चेत
4

“लेजेंड” म्हणत ‘धुरंधर 2’ दिग्दर्शक आदित्य धरने केले प्रभासचे कौतुक; पॅन-इंडिया स्टारडम पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.