Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्णा आजीच्या अंत्य संस्काराला ‘ठरलं तर मग’ टीममधलं कुणीच का गेलं नाही? मालिकेतील सदस्याने सांगितले सत्य

मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर या 'ठरलं तर मग' मालिकेमधील एक अविभाज्य भाग होत्या. मात्र ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मालिकेतील कुणीही गेलं नव्हतं.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 05, 2025 | 11:27 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पूर्णा आजीच्या अंत्य संस्काराला कुणीच का गेलं नाही?
  • ‘ठरलं तर मग’ टीममधील सदस्याने सांगितले सत्य
  • ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने इंडस्ट्रीमध्ये शोक
 

स्टार प्रवाहावरील चर्चात असलेली मालिका ‘ठरलं तर मग’ गेले कित्येक वर्ष टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातील सायली आणि अर्जुन याची जोडी प्रेक्षकांची पसंती ठरली आहे. नुकत्याच आता ४ डिसेंबर रोजी या मालिकेचे १००० भाग पूर्ण झाले आहेत. आणि सध्या मालिकेत सायलीचा भूतकाळ दाखवण्याचं काम सुरू आहे. लवकरच प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघाताचा आणि महिपतशी काय संबंध आहे हे शोधण्यात मालिकेची टीम व्यस्त आहे. पुढील खुलासा लवकरच होईल मालिकेमध्ये दाखण्यात आले आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील महत्वाचं पात्र पुर्णा आजी साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. आणि मराठी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. मात्र त्यांच्या अंत्य संस्काराला ‘ठरलं तर मग’ च्या सेटवरील कुणीच उपस्थित झाले नाही. आता मालिकेतील अश्विनने या सगळ्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

Dharmendra 90th Birth Anniversary: देओल कुटुंबियांचा मोठा निर्णय; फार्महाऊसवर होणार जल्लोष, चाहत्यांसाठीही सरप्राईज

‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये अश्विन या पात्राची भूमिका प्रतीक सुरेश या अभिनेत्याने साकारली आहे. अभिनेत्याचा नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिका १००० भागांचा टप्पा गाठत असताना व्हिडिओमध्ये अश्विनला विचारण्यात आले की, ‘१००० एपिसोड शूटिंगदरम्यानची एक अशी आठवण कोणती, जी कधीच विसरू शकत नाही?’ यावर उत्तर देताना अश्विनला पूर्णा आजी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची आठवण आली. त्यावर तो उत्तर देत म्हणाला, ‘तीन वर्षातील मला न विसरता येणारी आठवण म्हणजे, पूर्णा आजी गेली तो दिवस… तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप कठीण होता.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

अंत्य संस्काराला का गेले नाहीत कलाकार?

अश्विन पुढे म्हणाला, ‘आजी त्यादिवशी गेली आणि आम्हाला काही कारणास्तव शूट करावं लागलं होतं, कारण एपिसोड तयार झाले नव्हते. त्यादिवशी खरंच खूप वाईट वाटलं होतं. माणूस गमावल्याचं दुःख तर होतंच, ती आमची आजी होती… त्यात आम्हाला जाता नाही आलं आणि शूट करावं लागलं. याचं जास्त दुःख होत. तो एक दिवस खरंच न विसरता येण्यासारखा आहे.’ ‘ठरलं तर मग’ चं शूटिंग मुंबईत मढ आयलंडला होतं. मात्र पूर्णा आजी यांचं निधन पुण्याला झालं. त्यामुळे शूटिंग असल्याने कोणत्याही कलाकाराला जाता आलं नाही. याचं त्यांना खूप वाईट वाटलेलं.’ असे अभिनेता प्रतीक सुरेश म्हणाला.

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने कलाकारांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना देखील प्रचंड मोठा धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटामध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. तसेच त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यांच्या मालिकेला आणि त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे.

Web Title: Why tharla tar mag team absent from jyoti chandekar last riots actor reveals the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • entertainment
  • jyoti chandekar
  • marathi serial news

संबंधित बातम्या

‘जन नायकन’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार; मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी, काय होणार विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं?
1

‘जन नायकन’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार; मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी, काय होणार विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं?

३ वर्षांनंतर पुन्हा उलगडणार सत्य… सुरु होणार नव्या हत्येचा तपास! ‘Kohrra 2’ हा क्राइम थ्रिलर ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस
2

३ वर्षांनंतर पुन्हा उलगडणार सत्य… सुरु होणार नव्या हत्येचा तपास! ‘Kohrra 2’ हा क्राइम थ्रिलर ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस

हिंदी ‘बिग बॉस’ प्रेमींना झटका! ‘Bigg Boss OTT’ चा चौथा सीझन नाही होणार रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय
3

हिंदी ‘बिग बॉस’ प्रेमींना झटका! ‘Bigg Boss OTT’ चा चौथा सीझन नाही होणार रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो
4

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.