
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘चुना लगा दिया…’ म्हणत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; TOXIC चे पहिले गाणं ‘तबाही’ रिलीजआधीच ट्रोल
मेघना म्हणाल्या, “होळी हा माझा लहानपणापासून अत्यंत आवडता सण आहे. रंगांची उधळण, ढोल-ताशांचा गजर, मैत्रिणींसोबतची धमाल आणि आईच्या हाताची मऊ, लुसलुशीत पुरणपोळी – या सगळ्यामुळे हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरतो. होळी म्हणजे केवळ रंग लावणे नाही, तर मनातील सगळे गैरसमज, कटुता आणि नकारात्मक भावना दूर करण्याची संधी आहे. होळी दहनाच्या दिवशी आपण वाईट विचारांची जाळपोळ करतो आणि धुलिवंदनाच्या दिवशी प्रेम, आनंद आणि उत्साह साजरा करतो.”
लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेत्री म्हणाली, शेजारपाजारातील सगळे जण एकत्र येऊन रंग खेळायचे, गाणी म्हणायचे आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असायची. “त्या दिवसांत मोबाईल नव्हते, पण मनापासूनचा आनंद होता. आजही होळी आली की तेच बालपण पुन्हा जगल्यासारखं वाटतं,” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.
त्र्यंबकेश्वरात घेतला आशीर्वाद; अक्षया नाईकची नव्या मालिकेसह टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन!
यावर्षी मात्र होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे, कारण ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत साकारलेली पमा परब ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरणार आहे, असा विश्वास मेघना व्यक्त करताना दिसली आहे. “होळीच्या पवित्र महिन्यात, स्वामींच्या आशीर्वादाने आमच्या मालिकेची सुरुवात होत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नव्या प्रोजेक्टची सुरुवात इतक्या सकारात्मक वातावरणात होणे हे भाग्यच आहे,” असे अभिनेत्री म्हणाली आहे. १६ मार्चपासून ‘सनई चौघडे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.