Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानविरुद्ध बॉलिवूड कलाकार का बोलत नाहीत? दिग्दर्शक अनिल शर्मा जरा स्पष्टच बोलले…

एका मुलाखतीमध्ये 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना विचारण्यात आलं की, बॉलिवूडला कशाची भीती आहे? भारतीय कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानचे नाव का घेतले नाही.

  • By चेतन बोडके
Updated On: May 17, 2025 | 04:13 PM
पाकिस्तानविरुद्ध बॉलिवूड कलाकार का बोलत नाहीत? दिग्दर्शक अनिल शर्मा जरा स्पष्टच बोलले…

पाकिस्तानविरुद्ध बॉलिवूड कलाकार का बोलत नाहीत? दिग्दर्शक अनिल शर्मा जरा स्पष्टच बोलले…

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच केले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानामध्ये आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्हीही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध पाहायला मिळत आहेत. या संबंधांमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी आणि पाकिस्तानच्या कलाकारांनी भारताविरोधात अनेक भडकाऊ वक्तव्य केली, त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. या सर्वांदरम्यान काही मोजके सेलिब्रिटी वगळता बाकीच्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी मौन बाळगलंय, यामागचं कारण गदरच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Hera Pheri 3: “बाबू भैया शिवाय राजू आणि श्याम काय करणार?” परेश रावल यांच्या नकारावर काय म्हणाला सुनील शेट्टी?

झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना विचारण्यात आलं की, बॉलिवूडला कशाची भीती आहे? भारतीय कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानचे नाव का घेतले नाही. या प्रश्नाचं उत्तर देताना अनिल शर्मांनी सांगितले की, “मी ज्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले त्याच दिवशी मी पोस्ट केली होती. कारण, दहशतवाद हा फार वाईट आहे, देश कोणताही असो, जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो तो चांगला असू शकत नाही. त्या देशातील सामान्य नागरिक चांगले असतील, त्या देशाचे कलाकार तिथे राहत असल्याने ते भारताविरुद्ध ट्विट करत असतील. पण वाईट गोष्ट अशी आहे की, तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देत आहात. तुम्ही दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहात.”

अभिजित सावंत लग्नानंतर वापरायचा Tinder App, केला धक्कादायक खुलासा; म्हणाला “मी दोन- तीन मुलींसोबत…”

“जेव्हा भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून १०० हून अधिक दहशतवाद्यांना मारले, त्यांचे अड्डे उडवून दिले, तेही थेट पाकिस्तानात जाऊन. तिथले उच्च लष्करी अधिकारी त्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात. ते त्यांचे मित्र किंवा नातेवाईक असू शकतात पण टीव्हीवर जे दाखवले गेले त्यावरून, आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे कोणत्याही भावनेपेक्षा जास्त वाईट वाटूच शकत नाहीत. असं वाटत होतं, जसं की दहशतवादी त्यांचाच कारखाना होता जो नष्ट करण्यात आला. येणारे मेसेजेस खूपच भयानक आहेत. हे संपूर्ण जगासाठी योग्य नाही. अशा लोकांवर फिल्म इंडस्ट्रीने आणि भारतीय ट्रेडने बहिष्कार टाकायला हवा.” असं मुलाखती दरम्यान दिग्दर्शक म्हणाले.

सुरभी ज्योती आणि सुमित सुरी लग्नानंतरही राहत नाहीत एकत्र? टीव्ही अभिनेत्रीने सांगितले ‘हे’ मजेदार कारण!

पुढे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना, भारतीय कलाकारांना कशाची भीती वाटते? मार्केटिंगची भीती आहे का? की फॉलोअर्स गमावण्याची? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अनिल शर्मांनी सांगितले की, “तुम्ही स्वतः या प्रश्नांची उत्तरं दिलीत, मी काय उत्तर द्यावं? बॉलिवूडची परदेशामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यापैकी पाकिस्तानी प्रेक्षकांची संख्या खूप जास्त आहे. भारतीय कलाकारांचे पाकिस्तानी फॉलोअर्सही खूप जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की ही वेळ निघून जाईल. पण बोलल्यास मी माझे फॉलोअर्स गमावेल. माझं जग संपेल, माझ्याकडे ओव्हरसीज मार्केट राहणार नाही, असा विचार बरेच लोक करतात.”

‘जे मोठ्या कलाकारांना जमले नाही, ते नॅन्सीने पुन्हा एकदा करून दाखवले,’ कान्समध्ये हटके गाऊन घालून उंचावले देशाचे नाव!

अनिल शर्मा यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, “हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे मला माहिती नाही. पण तुम्ही ते म्हणाल्यापासून मी तुमच्या विधानाला दुजोरा दिला आहे, मला माहित नाही की हे खरे आहे की खोटे. पण मला तसं वाटत नाही. माझ्यासाठी, देशासमोर काहीही येत नाही. जर देश अस्तित्वात असेल तर आपण अस्तित्वात आहोत. आपण जगात कुठेही गेलो तरी, भारतातील आपली तिसरी किंवा चौथी पिढी अमेरिकेत स्थलांतरित झाली तरी लोक आपल्याला भारतीयच म्हणतील.”

Web Title: Why did many bollywood stars not speak against pakistan gadar director anil sharma told reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Film Director
  • Opreation Sindoor

संबंधित बातम्या

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?
1

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?
2

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?

Dhurandhar 2 : YouTube वर लीक झाला रणवीर सिंगचा चित्रपट; चाहत्यांनी मेकर्सला दिली माहिती
3

Dhurandhar 2 : YouTube वर लीक झाला रणवीर सिंगचा चित्रपट; चाहत्यांनी मेकर्सला दिली माहिती

अभिनेत्री ते निर्माती! Taapsee Pannu चा अर्थपूर्ण कथांकडे नवा प्रवास, ‘गांधारी’त सशक्त भूमिकेत झळकणार
4

अभिनेत्री ते निर्माती! Taapsee Pannu चा अर्थपूर्ण कथांकडे नवा प्रवास, ‘गांधारी’त सशक्त भूमिकेत झळकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.