Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 5 वैभवशाली प्राचीन शहरं जी जगातून अचानक झाली गायब; आजतागत शास्त्रद्यांना उलगडले नाही याचे रहस्य

भारताची संस्कृती फार जुनी असून यात इतिहासातील अनेक रहस्ये दडवून ठेवलेली आहेत. प्राचीन काळात देशात अनेक भव्य शहरे होती ज्यांचे अस्तित्व आता मिटलेले आहे. ही शहरे आज अस्तित्वात नसली तरी त्यांच्या कथा आजही आपल्यात जिवंत आहेत. आज आम्ही तुम्हाला भारताच्या इतिहासातील अशीच ५ सर्वात प्राचीन आणि भव्यदिव्य शहरे सांगणार आहोत जी रहस्यमय रीतीने कुठेतरी हरवून गेली. यांचे नाव काढताच अनेकांचे डोळे चमकून उठतात पण यांचे अस्तित्व मात्र कुठेही सापडत नाही...

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2025 | 02:57 PM

भारतातील 5 वैभवशाली प्राचीन शहरं जी जगातून अचानक झाली गायब; आजतागत शास्त्रद्यांना उलगडले नाही याचे रहस्य

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

भगवान श्रीकृष्णाचे प्राचीन शहर मानली जाणारी द्वारका नगरी आज तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. मथुरा डल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत एक नवीन शहर स्थापन केले होते आणि त्याला आपली राजधानी म्हणून घोषित केले होते. पण ते या जगातून गेल्यानंतर हे शहरही पाण्यात बुडाले. हे शहर समुद्रात कसे बुडाले याचे गूढ आजवर कुणाला उलगडू शकले नाही

2 / 5

गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भचौ तालुक्यातील खादीरबेट येथे स्थित धोलावीरा हे एक पुरातत्वीय स्थळ आहे. हे शहर ३०००-१५०० ईसापूर्व पासून अस्तित्वात होते. प्राचीन काळात येथे प्रगत जलसंचय तंत्रे, प्रचंड जलाशय आणि विचारपूर्वक डिझाइन केलेली अनेक ठिकाणे होती. पण हवामान बिघडल्यामुळे इथे अचानक दुष्काळ पडला आणि इथल्या रहिवाशांना हळूहळू हे ठिकाण सोडावे लागले. हे शहर आता एक ओसाड जमीन बनली असून आता इथे फक्त काही प्राचीन अवशेष शिल्लक आहेत जे तिथे राहणाऱ्या लोकांच्या कौशल्याची आणि त्याच्या गायब होण्याच्या गूढतेची साक्ष देतात.

3 / 5

मोहेंजोदारो हे त्या काळातील जगातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक होते. ते अविभाजित भारताच्या (सध्याच्या पाकिस्तान) सिंध प्रांतातील लरकाना जिल्ह्यात होते. हे शहर सिंधू नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले होते. परंतु काळाचा आघात अन् सुमारे १९०० ईसापूर्वमध्ये हे शहर रहस्यमयपणे ऱ्हासाला बळी पडले. असे का घडते याबद्दल अजूनही शास्त्रज्ञ गोंधळात आहेत.

4 / 5

चोल साम्राज्य हे दक्षिण भारतातील एक शक्तिशाली तमिळ राजवंश होते ज्याने ९ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत राज्य केले. या साम्राज्याची राजधानी कावेरीपट्टिनम किंवा पुहार होती. हे चोल साम्राज्याचे एक समृद्ध बंदर होते, ज्याच्या समृद्धीचे आणि चैतन्याचे वर्णन सिलप्पादिकरम सारख्या प्राचीन तमिळ साहित्यात केले आहे. परंतु ५०० च्या सुमारास, एका मोठ्या त्सुनामीने हे बंदर शहर उद्ध्वस्त केले. चोल साम्राज्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे आणि वैभवशाली साम्राज्य होते, ज्याने दक्षिण भारताच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव टाकला.

5 / 5

विजयनगर हे प्राचीन काळात कर्नाटकात भरभराटीला आलेले एक शक्तिशाली साम्राज्य होते. या साम्राज्याची राजधानी हंपी होती. हे शहर १४ व्या ते १६ व्या शतकापर्यंत भरभराटीला आले. त्या काळात ते संस्कृती, व्यापार आणि भव्य वास्तुकलेचे केंद्र होते. तथापि, १५६५ मध्ये तालीकोटाच्या युद्धानंतर, जेव्हा शत्रू सैन्याने शहरावर हल्ला केला, तेव्हा विजयानंतर भयानक हत्याकांड घडले. या काळात, शहर लुटले गेले आणि नष्ट केले गेले. आजही तेथे उभे असलेले मंदिरे, बाजारपेठा आणि राजवाड्यांचे अवशेष आपल्याला त्या वैभवशाली संस्कृतीची आठवण करून देतात.

Web Title: 5 glorious ancient cities in india that suddenly disappeared from the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Gujrat
  • new information
  • South India

संबंधित बातम्या

जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य… भारतातील या जागेचाही आहे समावेश
1

जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य… भारतातील या जागेचाही आहे समावेश

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका
2

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अनकथित गोष्टी आणि आजच्या साजरीकरणाच्या पद्धती
3

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अनकथित गोष्टी आणि आजच्या साजरीकरणाच्या पद्धती

जगाचा दृष्टिकोन बदलवून टाकणाऱ्या या चित्रपटांवर घालण्यात आली आहे बंदी; फक्त Youtube वर पाहायला मिळेल
4

जगाचा दृष्टिकोन बदलवून टाकणाऱ्या या चित्रपटांवर घालण्यात आली आहे बंदी; फक्त Youtube वर पाहायला मिळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.