Ashadhi Wari 2026 : टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांची पायी वारी; पाहा अप्रतिम दृश्ये
आषाढी वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक परंपरेपैकी एक मानली जाते. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पायी प्रवास करून पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात.
यंदाच्या वारीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत लाखो भाविकांनी मनोभावनेने सहभाग घेतला आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयघोष करत वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ (शनिवार) रोजी आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतील. राज्य सरकारकडून वाहतूक, आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
हातात भगवा ध्वज, डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि पारंपरिक वेशभूषेत हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी झाले. याचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.
वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून भक्ती, समता, बंधुभाव, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. अभंग-किर्तन गात लाखो वारकरी विठ्ठलभक्तीचा संदेश पसरवत पंढरीची वाट चालतात.