उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारतात. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर फ्रेश आणि ताजेतवटवीत दिसण्यासाठी नियमित एक ग्लास लिंबू पाण्याचे सेवन करावे. मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदामध्ये लिंबूला विशेष महत्व आहे. लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि यामध्ये असलेली पोषक तत्व शरीराला डिटॉक्सिफाय करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
आरोग्यासंबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा लिंबू पाण्याचे सेवन
वारंवार बिघडत असलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. गॅस, अपचन आणि पचनाच्या इतर सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.
वाढलेले वजन कमी करताना इतर कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी जळून जाते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स चयापचय गतिमान करतात.
त्वचा कायम तेजस्वी आणि तरुण ठेवण्यासाठी नियमित लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्यात असलेले घटक शरीरातील उष्णता कमी करतात आणि त्वचेला कायम फ्रेश ठेवतात. लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून स्वच्छ करतात आणि सुरकुत्या आणि डाग कमी करतात.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. यात असलेले गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय लिंबू पाणी पिल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
किडनी स्टोनची समस्या उद्भवल्यास लिंबू पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे किडनी स्टोन लघवीवाटे पडून जातो. तसेच मूत्रपिंडात जमा होणारे कॅल्शियम साठे विरघळण्यास मदत करतात.