बऱ्याचदा चित्रपट बनवताना लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात मात्र प्रत्येकवेळी हवा तसा प्रतिसाद मिळतोच असे नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मालिकेविषयी सांगणार आहोत, ज्याला बनवण्यासाठी निर्मात्यांनी यावर पाण्यासारखी गुंतवणूक केली होती, पण तसा प्रतिसाद या मालकेला मिळाला नाही. ही देशातील सर्वात महागडी मालिका आहे.
भारतातील सर्वात महागडा टीव्ही शो, ज्याला बनवण्यासाठी लागले तब्बल 500 कोटी

भारतातील सर्वात महागड्या टिव्ही शो विषयी बोलणे केले तर या मालिकेचे नाव पहिल्या स्थानी आहे. 2017-2018 मध्ये निर्मात्यांनी याला बनवला होता. याला बनवण्यासाठी निर्मात्यांनी 100-200 नाही तर 500 कोटी रूपये गुंतवले होते

हा एक ऐतिहासिक एपिक शो होता, ज्याचे नाव 'पोरस' असे होते. 'फर्स्टपोस्ट'नुसार, 2017 मध्ये हा शो बनवण्यासाठी मेकर्सनी सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले होते.

'पोरस'चे बजेट इतके होते की यासमोर मोठमोठे बाॅलिवूड चित्रपटही काहीच नव्हते. बाहुबली 2 चे बजेट 250 कोटी रुपये, ब्रह्मास्त्रचे बजेट 350 कोटी रुपये, जवानचे बजेट 300 कोटी रुपये आणि सिंघम अगेनचे बजेट 350 कोटी रुपये होते

या मालिकेत फाईट सीनसाठी महागडे VFX, युद्धाच्या दृश्यांसाठी हजारो लोकांना कास्ट ठेवण्यात आली होती. 'पोरस'चे एकूण 299 भाग प्रसारित झाले. म्हणजे प्रत्येक एपिसोडची किंमत जवळपास 1.70 कोटी रुपये असेल

'पोरस'ची निर्मिती स्वस्तिक प्रॉडक्शनच्या सिद्धार्थ कुमार तिवारीने केली होती आणि त्याची सुरुवात सोनी टीव्ही वाहिनीवर झाली. मात्र टीआरपीच्या शर्यतीत याला तितकासा चागला प्रतिसाद मिळाला नाही

असं म्हटलं जातं की, बजेटच्या तुलनेत ही मालिका लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली नाही आणि ती फ्लॉप ठरली






