तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?
तांब्याच्या बाटलीत कोमट किंवा खोलिच्या तापमानातील पाणी ठेवावे. यात गरम पाणी पिणे टाळावे, कारण खूप गरम पाणी तांब्यासोबत प्रतिक्रिया करते ज्यामुळे तांब्याचे कण पाण्यात विरघळू लागतात.
तांब्याच्या बाटलीत गरम पाणी टाकल्याने पाण्यात तांब्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
अशा पाण्याचे सतत सेवन केल्यास पोटदुखी, मळमळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात. याचा यकृतावरही परिणाम होऊ शकतो.
तांब्याच्या बाटलीत कोमट पाणी किंवा खोलीच्या तापमानातील पाणी पिणे पिणे योग्य ठरेल. तांब्याच्या बाटलीत पाणी ६-८ तास ठेवा, मग ते अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांसह "कॉपर चार्ज्ड वॉटर" बनते.
हे पाणी तुमचे पचन सुधारण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते.