फोटो सौजन्य - BCCI/ ICC
भारताचा किंग कोहलीने त्याच्या करियरचा शेवटचा T-२० सामना खेळून या फॉरमॅटला अलविदा केलं आहे. अंतिम सामन्यांमध्ये त्याने महत्वाची खेळी खेळली.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. ज्यावेळी भारताच्या संघाने विजय मिळवला तेव्हा त्यांच्या मिक्स भावना समोर आल्या.
भारताचा कॅप्टन रोहित शर्माने या विश्वचषकामध्ये त्याचबरोबर भारतीय क्रिकेटला वेगळ्या स्तरावर नेले आहे. हिटमॅनने सुद्धा त्याचा शेवटचा T-२० सामना होता अशी घोषणा केली आहे.
भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फायनलच्या सामन्यातही त्याने महत्वाची भूमिका बजावून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून त्याचे अश्रू अनावर झाले.
सामन्यातील गेमचेंजर सूर्यकुमार यादवच्या कॅच कोणी कस काय विसरू शकतो. डेव्हिड मिलरने बाउंड्री बाहेर मारलेला हा षटकार सूर्याने झेल घेऊन गेम भारताकडे वळवला.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्यामध्ये दमदार खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर तो त्याच्या लेकासोबत मैदानात दिसला.