पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा
उत्तर भारतीय उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अतिशय आवडीने कच्च्या आंब्यांपासून बनवलेले पन्ह प्यायले जाते. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते आणि शरीरात थंडावा टिकून राहतो.
गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागात कोकम सरबत किंवा कोकमचा वापर करून बनवलेली सोलकढी अतिशय आवडीने प्यायली जाते. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी सोलकढी आवर्जून प्यावी.
भारताच्या कानाकोपऱ्यातील सगळ्यांच्या आवडीचे पेय म्हणजे लिंबू सरबत. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी निघून गेल्यानंतर खूप जास्त थकवा अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी लिंबू पाणी प्यावे.
बिहार आणि पूर्व भारतात लोकप्रिय असलेले सत्तू सरबत त्याच्या साधेपणामुळे खूप खास बनले आहे. सत्तूचे सरबत प्यायल्यानंतर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि शरीरात थंडावा टिकून राहतो.
वर्षाच्या बाराही महिने दुपारच्या जेवणानंतर नियमित ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासोबतच आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया वाढण्यास मदत होईल.