Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 09, 2025 | 11:39 AM
aaditya thackeray press confernce on raj and uddhav thackeray alliance

aaditya thackeray press confernce on raj and uddhav thackeray alliance

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राजकीय हालाचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह इतर महत्त्वाच्या पालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील हेवेदावे विसरुन पुन्हा एकदा एकत्रित लढत देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मराठी माणसांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठे विधान केले होते. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या खांद्यावर दिली असल्याचे मोठे विधान खैरेंनी केले. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच राज्यामध्ये मनसे व शिवसेनेची युती होणार का यावरुन देखील भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “याबाबत चंद्रकांत खैरे यांना फोन करून विचारा. मी तुम्हाला सांगतो की यामध्ये कोण काय बोलतंय? कोणावर काय जबाबदारी आहे? यापेक्षा हे महत्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलो आहोत की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी जे कोणी पक्ष बरोबर यायला तयार आहेत, आम्ही त्यांना बरोबर घेऊन हा लढा देऊ”, असं सूचक भाष्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन लढणं गरजेचं

पुढे ते म्हणाले की, “अदानी समूह असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल हे मुंबई आणि महाराष्ट्र गिळंकृत करायला निघालेले आहेत. अनेक अत्याचारांच्या घटना या महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणते पक्ष लढत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे’, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युतीमध्ये येणार असण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे ते घडेल. संकेत नाही, काही दिवसांत बातमी देईन. तसेच त्यांच्या शिवसैनिकांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही”. उद्धव ठाकरे यांच्या विधानापूर्वी राज ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संदीप देशपांडे म्हणाले होते की, सध्या दोघांमध्ये युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. प्रस्ताव आल्यानंतर राज ठाकरे विचार करतील. मागच्यावेळी आमचे तोंड भाजले आहे. त्यामुळे यावेळी आम्ही ताक सुद्धा फुंकून पिऊ, असे सूचक विधान संदीप देशपांडे यांनी दिले होते.

Web Title: Aaditya thackeray press confernce on raj and uddhav thackeray alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Raj Thackeary
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!
1

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.