Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राज्याच्या मंत्रिमंडळात सगळे तुरुंगातून बाहेर आलेले लोकं…; जयकुमार गोरेंच्या प्रकरणावर अंजली दमानिया आक्रमक

धनंजय मुंडे यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2025 | 04:12 PM
Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यांवरुन ते रंगते आहेत. काल (दि.03) अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेते व मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्याविरोधात अनेक पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. यानंतर आता भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर देखील अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे. वाईट कामं करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे,” अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे तुरुंगातून बाहेर आलेले लोकं घेतले जातात. यापूर्वीदेखील असं घडलं आहे. तोच प्रकार आता पुन्हा झाला आहे. जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात घेतलं आहे. मंत्री झाल्यावर गोरे यांनी पुन्हा त्या महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी मी केली आहे,” असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्या म्हणाल्या की, “काल रात्री मला अशी माहिती मिळाली की स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला जयकुमार गोरे गेल्या अनेक वर्षांपासून त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यानंतर जयकुमार गोरे तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी परत त्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. आता ते मंत्री झाले आहेत. आता त्यांचा त्रास आणखी वाढला आहे,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, “स्वारगेटप्रमाणे जे प्रकरण समोर येत आहे. तसाच एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढल्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसतेय. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. हे सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Anjali damania reaction on jaykumar gore case maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Anjali Damnia
  • Jaykumar Gore
  • Santosh Deshmukh Murder

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.