
Abhijit Dipke Replied RSS: नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही!; अभिजित दीपकेंचा RSS वर पलटवार
“ज्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये, नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही होता. अशा शब्दांत अभिजीत दिपकेंनी लिमयेंना प्रत्युत्तर दिले. तसेच, “शांततापूर्ण आंदोलनाला राष्ट्रविरोधी म्हणण्याचा संघाला कोणताही नैतिक अधिकार नाही,”
CJPच्या आंदोलनाचा ‘केस स्टडी’ करून त्यामागील कालक्रम, कार्यपद्धती, समर्थन व्यवस्था आणि विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. अभिजीत दिपके यांच्या भारतात आल्यानंतर त्यांनी दिल्लीसह इतर शहरांत झालेल्या सुरुवातीच्या आंदोलनांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, २० जूननंतर जंतर-मंतरवरील ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने मोठे प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे दिपके यांच्या आगमनापासून २० जूनपर्यंत नेमके काय घडले, कोणती समर्थन व्यवस्था या आंदोलनाशी जोडली गेली आणि त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप कसे बदलले, याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
लिमये म्हणाले की, आंदोलनाला पुढे अनेक डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे समर्थन मिळाले. त्या संघटनांची भूमिका आणि त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाची दिशा बदलली हिंदूविरोधी भूमिका का मांडल्या गेल्या, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्या व्यक्ती या आंदोलनात कशा सहभागी झाल्या, आंदोलनाचे नेतृत्व डाव्या संघटनांकडे कसे गेले आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय आंदोलनात कसे रूपांतरित झाले, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.”
तसेच आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी-विद्यार्थिनींची भाषा, वर्तन आणि पोशाख भारतीय संस्कृतीशी सुसंगत नसल्याचे मत व्यक्त करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘Grammar of Anarchy’ या प्रसिद्ध भाषणाचा उल्लेख केला आणि अशा अराजक प्रवृत्तींपासून देशाने सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.