Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…तर गावठाण कोळीवाड्यातील भूमिपुत्र महायुतीच्या विरोधात मतदान करतील”; मुंबई आगरी सेनेचा महायुतीवर हल्लाबोल

धारावी पुनर्वसन आणि भुमीपुत्रांकडे केलं जाणारं दुर्लक्ष याबात मुंबई आगरी सेनेने महायुती सरकारविरोधात नाराजीचा सूर लावला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 18, 2024 | 03:29 PM
"...तर गावठाण कोळीवाड्यातील भूमिपुत्र महायुतीच्या विरोधात मतदान करतील"; मुंबई आगरी सेनेचा महायुतीवर हल्लाबोल

"...तर गावठाण कोळीवाड्यातील भूमिपुत्र महायुतीच्या विरोधात मतदान करतील"; मुंबई आगरी सेनेचा महायुतीवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

रायगड /किरण बाथम :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी महायुतीच्या महाराष्ट्र सरकारकडून शेकडो निर्णय घेण्यात आले. मात्र राज्य सरकारने मुंबईतील मूळ भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केलं आहे. आगरी सेना मुंबई अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांनी कोळीवाडयांच्या विकासाकरिता स्वतंत्र ” गावठाण विकास महामंडळ ” स्थापन करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र त्यांच्या या मागणीकडे राज्य शासनाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारवर नाराज असलेल्यामुळे मुंबई आगरी सेनेच्या वतीने जयेंद्रदादा खुणे यांनी मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी, कोळी, ईस्ट इंडियन,भंडारी,आदिवासी समाजावतीने गावठाणांचा विकास न केल्यामुळे लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील गावठाण कोळीवाड्याचा विकास न केल्यामुळे मूळ भूमिपुत्र हे महायुतीच्या विरोधात मतदान करतील असं जयेंद्रदादा खुणे यांनी सत्ताधारी सरकारला इशारा दिला आहे.

हेही वाचा-विधानसभेसाठी मनसे ॲक्शन मोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील गावठाण कोळीवाडयांच्या विकासासाठी स्वतंत्र ” गावठाण विकास महामंडळ ” स्थापन करून या कोळीवाड्यातील गावांचा, पाड्यांचा, घरांचा व जमिनीचा योग्य तो विकास व्हावा अशी या भूमीपुत्रांची मागणी आहे. हीच बाब लक्षात घेत जयेंद्रदादा खुणे यांनी मंत्रालय येथे निवृत्त न्यायमूर्ती श्री. व्हि.एम. कानडे साहेब ( लोकआयुक्त , महाराष्ट्र राज्य ) यांच्याकडे धाव घेतली. याबाबत. लोकआयुक्त कार्यालयात बुधवारी दुपारी सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी संबंधित विविध खात्यातील अनेक शासकीय – प्रशासकीय अधिकारी सुनावणीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे लोक आयुक्त निवृत्त न्यायमूर्ती मा. श्री. व्हि. एम. कानडे यांच्यासमोर गावठाण कोळीवाडयांच्या विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा विनिमय करण्यात आली.

हेही वाचा- बच्चू कडू अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 4 तारखेला करणार गौप्यस्फोट

भांडुप, मुलुंड, कांजूर येथे मिठागराच्या जागेत धारावीकरांचे पुनर्वसन करण्यास येथील भुमीपुत्रांचा विरोध आहे. जर या ठिकाणी लाखो लोकांची वस्ती झाली तर मूळ भूमिपुत्रांच्या गावठाण कोळीवाड्यात खाडीतील पाणी घुसून घरं उध्वस्त होतील. गावठाण कोळीवाड्यातील मूळ भूमिपुत्रांची वाढती कुटुंबे आणि राहण्यास अपुरी जागा, एका मजल्यावर दुसरा मजला चढवायचा असेल तर मूळ जमीन मालकांच्या घरांच्या गावठाणतील बांधकामांना महानगर पालिकेमुळे होणारा त्रास आणि अपुऱ्या नागरीसुविधांमुळे भूमिपुत्रांची होणारी गैरसोय होत आहे.त्यामुळे येथे धारावीकरांना जागा देण्याअगोदर मूळ भूमिपुत्रांच्या गावठाणांचा विकास करावा,अशी मागणी जयेंद्रदादा खुणे यांनी केली. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गावठाण कोळीवाडयांच्या विकासासंदर्भात एकदाही आम्हाला बोलावले नाही असा आरोप जयेंद्र दादा यांनी केला. पुढे ते असंही म्हणाले की, याविषयाबाबत बैठका घेतल्या नाही म्हणूनच गावठाण कोळीवाडयांचा विकास अजूनही रखडला आहे. दरम्यान या सगळ्य़ा प्रकणावर पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होईल असं लोकआयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title: Gavthan koliwada will vote against mahayuti jayendra dada khune attack on mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Vidhansabha Election

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश
4

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.