
नऊ राज्यांत प्रथमच भाजपचे मुख्यमंत्री
नवी दिल्ली : आसाममधील निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. यावरून आता भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तिसरा कार्यकाळ मिळेल की आठवडाभराच्या संघर्षानंतर काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश येईल, हे ठरेल.
आसाम विधानसभा निवडणुकीत अस्मितेचे राजकारण, कल्याणकारी योजनांचे वितरण आणि प्रादेशिक आकांक्षा यांचे वर्चस्व होते. राज्यातील १२६ विधानसभा जागांसाठी ७२२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे, ज्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सर्व ३५ जिल्ह्यांमधील ४० मतमोजणी केंद्रांवर ईव्हीएम उघडण्यात येतील. उमेदवारांमध्ये ५९ महिला आहेत. नागाव जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या केंद्रांवर, तर कराझार, तिनसुकिया आणि जोरहाट येथे प्रत्येकी दोन केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी केंद्रे आणि ईव्हीएम असलेल्या स्ट्रॉग रूम्सच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पंचवीस कंपन्या तैनात केल्या आहेत. स्ट्रॉग रूम्समधून ईव्हीएम मतमोजणी केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन आणखी ८०० पोलिस कर्मचारी तैनात करणार आहे.
सीएपीएफच्या दोन कंपन्या कायमस्वरूपी राहणार
मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग गोयल यांनी सांगितले की, सीएपीएफच्या दोन अतिरिक्त कंपन्या कायमस्वरूपी कर्तव्यावर असतील. राज्य सशस्त्र पोलिसांच्या ९३ कंपन्या जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास तिचा सामना करण्यासाठी ८५ असॉल्ट गटांची मदतही मागण्यात आली आहे.
9 एप्रिलला झाले मतदान
राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान झाले, ज्यात २५ लाखांहून अधिक मतदारांपैकी ८५.९६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीतील ७२२ उमेदवारांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक ९९ उमेदवार आहेत. यानंतर, भाजपचे ९० उमेदवार, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे ३०, रालोआचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेचे २६ आणि बोडो पीपल्स फ्रंटचे ११ उमेदवार आहेत. विरोधी आघाडीमध्ये, रायजोर दलाने १३ जागा, आसाम जातीय परिषदेने १०, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) तीन आणि ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्सने दोन जागा लढवल्या आहेत.
Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे