महापौरपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस खासदार या पराभवासाठी शिवसेना (यूबीटी) आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचे पाकिस्तानसोबत खास संबंध असल्याचा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस पक्षाचे अंतर्गत वातावरण समजते ते शशी थरुर यांच्या वक्तव्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. गेल्या दशकाहून अधिक काळ पक्षात काय चालले आहे ते संपूर्ण देशाला स्पष्टपणे दिसत आहे.
आरोप करणारी व्यक्ती जबाबदार नसल्याने अशा वक्तव्यांना महत्त्व देत नसल्याचे खासदार धानोरकर म्हणाल्या, स्वतः विजय वडेट्टीवार यांनी थेट भूमिका मांडली असती, तर ती ग्राह्य धरली गेली असती, असेही त्यांनी स्पष्ट…
एका ज्येष्ठ नगरसेवकाची उमेदवारी मागे घेतल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे 'मतदानाच्या दिवशी काय करायचे ते पाहू', असा इशाराच दिला. जर हा रोष कायम राहिला, तर अधिकृत उमेदवारांना मोठा फटका…
दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस कोअर किमिटीच्या बैठकीपूर्वीच ही पोस्ट केली होती. त्यानंतर ते स्वत: बैठकीला उपस्थित होते या वस्तुस्थितीमुळे या पोस्टचे महत्त्व आणखी वाढले आहे.
गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. राज्य सरकारला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबरला 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा सामान्य राजकीय बदलाचा परिणाम नव्हता, तर तो अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलच्या मोसादच्या कथित कटाचा परिणाम होता.
काँग्रेस पक्षाच्या मूलभूत तत्त्वांबाबत, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबाबत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार अवांछित आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल कारवाई केल गेली.
नगरपंचायतमध्ये भाजपला सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी नगरसेविका कल्पना मारोटकर यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे हे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू युती करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद घटल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.