Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “८-८ दिवसांचे दौरे करण्याची वैभव नाईकांना…”; उदय सामंतांची टीका

जे नेते प्रचारासाठी ८-८ दिवस बाहेर असतात, त्यांच्याकडेच कपड्यांच्या बॅगा असतात, जे नेते प्रचारासाठी बाहेरच पडत नाहीत, त्यांच्याकडे बॅगा असण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी वैभव नाईक यांना लगावला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 03, 2025 | 11:18 AM
Maharashtra Politics: “८-८ दिवसांचे दौरे करण्याची वैभव नाईकांना…”; उदय सामंतांची टीका
Follow Us
Follow Us:

आठ-आठ दिवस दौरे करण्याची वैभव नाईक यांना सवय नाही
राज्यभरात सलग ५३ सभा घेणारे एकमेव नेते – उदय सामंत 
राग न ठेवता विकासासाठी पाहिजे ती मदत केली – सामंत

रत्नागिरी: शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवणमध्ये हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर त्यांनी आपल्या सोबतच्या बॅगांमध्ये जे कपडे होते, त्यातून पैसे आणले होते, असा बालिश आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. वैभव नाईक यांच्या एका म्हणण्यात तथ्य होते. कारण ज्या बॅगा एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून आणल्या होत्या, त्यामध्ये त्यांचे कपडे होते आणि ते प्रचाराला बाहेर पडले की, ८-८ दिवस बाहेर असतात. त्यामुळे त्यांना बॅगांमधून कपडे आणावेच लागतात. असे ८-८ दिवसांचे दौरे करण्याची वैभव नाईक यांना सवय नाही. त्यामुळे ते केवळ दोन तासांसाठी येतात आणि पर्यटन करून जातात. त्यांच्याकडे बॅगा व त्यात कपडे असण्याची शक्यताच नाही. केवळ मोठ्या नेत्यावर टीका केली, आरोप केले की आपणही मोठे होतो, अशी वैभव नाईक यांची भूमिका असावी.

नाईकांना लगावला टोला
अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना शंभर टक्के मार्क देतील, अशी त्यांची अपेक्षा असावी. एकूणच नैराश्यातून वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत लगावला.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदारांना पैसे वाटप; वैभव नाईकांनी व्हिडिओ जारी करत साधला निशाणा

राज्यभरात सलग ५३ सभा घेणारे एकमेव नेते…

मंत्री सामंत म्हणाले की, मंत्री सामंत म्हणाले, मी कालच प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणालो होतो की एकनाथ शिंदे हे राज्यात सलग ५३ सभा घेणारे एकमेव नेते आहेत. हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो. मात्र हा आरोप करताना वैभव नाईक हे एक गोष्ट विसरले आहेत की, याआधी आपत्तीच्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री हे त्यावेळी त्यांच्या मतदारसंघात आले होते व अनेकांना मदतीचा हातही दिला होता. एकनाथ शिंदे यांनी आपत्तीच्यावेळी जीव तोडून त्यांच्या मतदारसंघात मदतही केली होती, हे वैभव नाईकांनी विसरू नये. त्यामुळे नाईक यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची राजकीय अपरिपक्वताच दिसून आली आहे.

राग न ठेवता विकासासाठी पाहिजे ती मदत केली…
जे नेते प्रचारासाठी ८-८ दिवस बाहेर असतात, त्यांच्याकडेच कपड्यांच्या बॅगा असतात, जे नेते प्रचारासाठी बाहेरच पडत नाहीत, त्यांच्याकडे बॅगा असण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी वैभव नाईक यांना लगावला. राजकारण हे सर्वच करतात, परंतु आपण विरोधात असतानाही ज्यांची काम केली जातात, त्यांच्याबाबत कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जाणीव असायला हवी, ठेवायला हवी. एक मित्र म्हणून माझी त्यांना विनंती आहे, राजकारण हे होतच राहते. वैभव नाईक आमच्या पक्षात आले नाहीत, याचा कोणताही राग एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनात न ठेवता, त्यांना पाहिजे ती मदत विकासाच्या कामासाठी केलेली आहे. याची जाणीव ठेवून वैभव नाईक यांनी वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत जे आरोप केले आहेत, ते धादांत खोटे आहेत, असे सामंत म्हणाले.

Web Title: Minister uday samant criticizes to vaibhav naik about dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Uday Samant
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
1

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
2

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
3

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
4

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.