Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“परळीतील वाल्मिक कराड समर्थकांचे आंदोलन हे मणिपूर हिंसाचारप्रमाणे…”; खासदार संजय राऊतांचा घणाघात

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन महायुतीवर निशाणा साधला. तसेच ते मणिपूरला कधी जाणार असा सवाल केला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2025 | 10:53 AM
'मातोश्री'वर लिंबू अन् काळी जादू; फडणवीस 'वर्षा'वर का राहत नाहीत? राऊतांचा राणेंना सवाल

'मातोश्री'वर लिंबू अन् काळी जादू; फडणवीस 'वर्षा'वर का राहत नाहीत? राऊतांचा राणेंना सवाल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकारण तापले आहे. आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून वाल्मिक कराड याची आई आणि समर्थकांनी मोठा गदारोळ करत आंदोलन केले आहे. आरोपीच्या समर्थनार्थक केले जाणारे आंदोलन हे घातक असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. यावरुन खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी येत असतील तर त्यांचं मुंबई स्वागतच करेल. ते तर आमचे देशाचे पंतप्रधान आहेत. आता धारावीचा प्रश्न आहे. आम्ही त्यांच्याकडे धारावी आमची लुटू नका म्हणून मागणी केली आहे. बघू आता धारावीबाबत काही घोषणा करतायेत का बघूया. आता पंतप्रधान हे मणिपूरमध्ये कधी जाणार हे देखील पाहावं लागेल. दिल्ली निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांना प्रचाराचं कोणतं काम नसेल त्यामुळे त्यांनी मणिपूरला जावं, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

ईव्हीएम आणि नोटांची पूजा करा

पुढे ते म्हणाले की, महायुतीच्या कार्यक्रमाच्या मंचावर आज ईव्हीएम मशीन ठेवून त्याची पूजा केली पाहिजे. नोटांची बंडल देखील ठेवली पाहिजे. मग मंचावर विजयाचे शिल्पकार येतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि प्रफुल पटेल यांच्यावर पंतप्रधानांनी मंचावर स्वतः गंभीर आरोप केले होते. पण आता ते त्यांना बाजूला ठेवणार आहेत का? ही सगळी ढोंग आहेत. महायुतीमध्ये 40 टक्के लोक हे कलंकित आहे. तर मग धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महायुतीचे 40 टक्के नेते कलंकित

महयुतीमधील हे नेते हे कलंकित आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे सातत्याने सांगत होते. आता ते कसे काय स्वच्छ झाले? त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि इतरांना एक न्याय हा काय प्रकार आहे? हा फार संशोधनचा प्रकार आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच वाल्मिक कराडच्या समर्नार्थ आंदोलन करत परळी बंदची हाक देणाऱ्या आंदोलकांवरुन देखील संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

ते म्हणाले की, हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला मोक्का लावणं आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यांवर उतरणं हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार होत असेल. हा हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या कायदेशीर कारवाई सुरु होत असताना एखाद्या गुन्हेगाराला भाजपचे समर्थक म्हणून घेणार लोक रस्त्यावर उतरतात. हिंसाचार करतात. परळी बंद ठेवतात आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. हा काय प्रकार आहे? याचं उत्तर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut targets bjp and mahayuti over pm narendra modi mumbai maharashtra visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता
1

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच
2

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
4

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.