Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे बंधूंनंतर दोन्ही राष्ट्रवादी देखील येणार का एकत्र? अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून लाडकी बहीण हप्त्याबाबत माहिती दिली आहे. तसेच जातीनिहाय जनगणनेवरुन टीका करणाऱ्या कॉंग्रेसला उत्तर दिले.

  • By प्रीति माने
Updated On: May 02, 2025 | 04:16 PM
ncp dcm ajit pawar kolhapur live press confernce daily political news

ncp dcm ajit pawar kolhapur live press confernce daily political news

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे परिवार एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये देखील झालेले दोन गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत देखील अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या रिपोर्टवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करतो आहे. नव्या पिढीला जुनी माहिती मिळावी यासाठी देखील कार्यक्रम ठेवला आहे. पाच विभागातील पवित्र माती आणि पाणी यांचं पूजन होणार आहे. महायुतीला प्रचंड यश मिळालं पण चंदगडची जागा आम्हला जिंकता आली नाही याची खंत आहे. याठिकाणी राजेश पाटील यांनी चांगलं काम केलं होतं, पण बंडखोर उमेदवाराला निवडून दिलं. १०० दिवस पूर्ण झाले पण आम्ही चांगले काम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या कामात आम्ही सातत्य ठेवणार आहोत. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आधी गंभीरतेने घेतलं नाही. पण आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आहे की, चांगलं काम केलं पाहिजे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहलगाम हल्ल्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये आमच्या पर्यटकांचा घात केला. त्यांचा बदला घ्यायचा आहे, माझं ही तेच मत आहे. आपण सगळे भारतीय आहोत, भारत कसा मजबूत आहे हे दाखवलं जाईल. घरातील कर्ता माणूस गेला की पैसे देऊन निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. त्यांच्या वारसांना ५० लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.

पुढे अजित पवार यांनी केंद्र सरकारवर होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “जनगणनेच्या बाबतीत विरोधक दबाव आणू शकतात का? देशाचे पंतप्रधान कुणाच्या दबावात येतील असं वाटतं का? आत्ताच्या सरकारनेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कुठल्या घटकाची लोकसंख्या किती आहे, हे समोर येईल. काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती, ती त्यावेळी का केलं नाही? आम्हाला लोकसभेला मोठा फटका बसला त्यानंतर आम्ही कामाला लागलो त्यामुळे विधानसभेत आम्हाला यश मिळालं,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विरोधकांनी पालकमंत्रिपद आणि लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हफ्त्यांचं नियोजन केलं आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने मी या निधीचं नियोजन करायला लावलं. सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला जात आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आश्वासन कोणी दिले? रायगडला पालकमंत्री पद दिले नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, कोण काय बोललं याच्याबद्दल मला विचारू नका. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे मी माध्यमांतूनच ऐकतोय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तशी भावना स्वाभाविक आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

Web Title: Ncp dcm ajit pawar kolhapur live press confernce daily political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ladki Bahin Yojana
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
1

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
2

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!
3

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत
4

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.