Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime News : “धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात…”; जितेंद्र आव्हाडांचा टोला

बीड हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे राजकारण तापले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2025 | 11:15 AM
jitendra awhad target dhanajay munde for beed murder case

jitendra awhad target dhanajay munde for beed murder case

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. मागील दोन महिन्यांपासून यावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचा आरोप करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्या मदतीसाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज धावून आले आहेत. मात्र त्यांनी केलेली राजकीय टिप्पणी नेत्यांना आवडली नसून अनेकांनी यावरुन टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. या भेटनंतर नामदेव शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधून धनंजय मुंडे हे गुन्हेगार नसल्याचे म्हटले आहे. मात्र भगवान गडाच्या महंतांनी राजकीय टिप्पणी करणे हे विरोधकांना आणि मयत संतोष देशमुख यांच्या परिवाराला पटलेले नाही. या प्रकरणात ज्यांनी संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी अशी मागणी देखील नामदेव शास्त्री महाराज यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

माध्यमांशी संवाद साधताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “महंत म्हणतात की पंकजा मुंडे माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांची बाजू घेतली नाही. कराड हा आरोपी आहे. तर धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने आपण त्यांची बाजू घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहिजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत त्या गादीला मोठी परंपरा आहे,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे ते म्हणाले की, “भगवान गडची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर भीमसेन महाराज आले, ते राजपूत समाजाचे होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटारसायकलवर येऊन बसलं हे सगळ्यांना माहिती आहे. संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने संत पदी नेले होते. या गादीचा मान राखायला हवा. आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात,” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

नामदेव शास्त्री काय म्हणाले?

डॉ. नामदेव महाराज शास्त्रीय यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असे स्पष्ट मत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले होते.

 

Web Title: Ncp jitendra awhad target dhanajay munde for beed santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर
1

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त
2

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण
3

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?
4

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.