
Rahul Gandhi says Modi Government will collapse in next year, Rahul Gandhi slams PM Narendra Modi,
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी म्हणाले कि, “आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष हे प्रमुख घटक असतील. बदलत्या परिस्थितीचा आणि लोकांच्या वाढत्या असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल,” असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने आता राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांनी हि बैठक आयोजित केली होती.
बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ शब्दा ऐवजी ‘अल्पसंख्यांक” हा शब्द वापरण्याचाही सूचना केली होती. मात्र राहुल गांधी यांनी याला विरोध केला. ते म्हणाले, ‘अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही समुदायाच्या पाठीशी आपण उघडपणे उभे राहिले पाहिजे. घाबरण्याची काही गरज नाही. हिंदू, दलित, उच्चवर्णीय, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन अश्या सर्वांच्या हक्कांसाठी काँग्रेसने आवाज उठवला पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “राऊत व राहुल यांच्यात साम्य काय? दोघेही खोट्या भविष्यवाण्या न चुकता करतात आणि प्रत्येकवेळी तोंडावर आपटतात! “मोदी सरकार आज जाणार, उद्या जाणार, महिन्याअखेरीस कोसळणार, वर्षाअखेरीस पडणार…” अशा भंपक भविष्यवाण्यांचा उद्योग करणारे विरोधकांचे टोळके कायम सक्रिय असते. आता त्या टोळीचे नेतृत्व बहुधा काँग्रेसच्या ‘पप्पू’कडे गेले असावे!”
डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी, हर्षवर्धन सकपाळ सरकारवर भडकले!
ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे झाले, राऊत झाले, ममता बनर्जी झाल्या, स्टॅलिन झाले, नाना पटोले झाले… ‘इंडी’ आघाडीतील जवळपास प्रत्येक नेत्याने मोदी सरकार पडणार अशी वल्गना केली. पण जनतेने प्रत्येकवेळी त्यांचीच हवा काढली. आता अचानक राहुल गांधींना “ज्ञानप्राप्ती” झाली आणि त्यांनी नवा दावा केला — “पुढील वर्षभरात नरेंद्र मोदी सरकार कोसळणार!” विरोधकांची ही हास्यजत्राच सुरू आहे आणि त्यात सध्या विनोदी कलाकाराची भूमिका राहुल गांधी बजावत आहेत. खोटारडेपणा, दिशाभूल आणि सततच्या अपयशी भविष्यवाण्यांमुळे “रिजेक्टेड नेता” हा किताब त्यांनी आधीच मिळवला आहे, हे देश विसरलेला नाही. राहुलजी, तुम्ही चक्क रेटून बोला, चीनच्या स्क्रिप्टवर बिनधास्त डोला… सुपारीबाजांचा खेळ कितीही रंगला, तरी मोदी सरकार जनतेच्या विश्वासावर भक्कम उभं राहिलं!” असे ते यावेळी म्हणाले.