
Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,
“अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बाबत नेमकं काय झालं होतं? असा प्रतिप्रश्न आधी त्यांनी उपस्थित केला. राजकीय दृष्टीकोनातून आदित्य ठाकरेंचनाव घेतलं गेल. त्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळाली. आता दिशा सालियन प्रकरणातही त्यांना क्लीनचीट मिळेल. सीबीआयवर विश्वास नसला तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पुढच्या तीन वर्षात कोणतीही निवडणूक नसल्याने आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीआधी होऊ शकतात, असं वाटू लागलं आहे.” असं रोहित पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, “मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यचा मोठा प्रश्न आहे. गेल्या वेळी झालेल्या आंदोलनात लोकांना मोठ्या अडचणी सोसव्या लागल्या, तिथे हॉटेल, रेस्टॉरंट असतानाही ते बंद कऱण्यात आले होते. चहापाण्याची दुकानेही बंद करण्यात आली, स्वच्छतागृहाचं नियोजन नव्हतं. या सगळ्याचा विचार करून सरकारने लवकर यावर निर्णय घ्यावा. जरांगेंचं उपोषण पुढे न्यायचं की नाही हा सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय आहे” असं रोहित पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे अर्धसत्य बोलत असल्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. शंभुराज देसाईंना ते अर्धसत्य वाटत असेल, तर पूर्णसत्य काय आहे हे देसाईसाहेबांनी मीडियासमोर येऊन सांगावं. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं आहे. फक्त अर्धसत्य बोलून चालत नाही. असा टोला रोहित पवारांनी लगावला. तसेच, जरांगे पाटलांनी तो निर्णय घेतलाय. सरकारकडून ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाली नाही. कोणीही आंदोलनाला बसला तर सरकार त्यांच्यासमोर संवाद साधण्यास कुठेतरी कमी पडत आहे.असंही रोहित पवार यांनी नमुद केलं.
“मीडियात अर्धसत्य बोलून चालत नाही. सत्ता त्यांच्याकडे आहे. निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. आज राज्यात बऱ्याच ठिकाणी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत, अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याची मदत अजून मिळालेली नाही. MPSCच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. CET चा मुद्दा आहे, महिला सुरक्षेचा मुद्दा आहे, त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल ततर, सरकार मुद्दामून तो विषय लांबवतय की काय असं वाटतं” असं रोहित पवार म्हणाले.