Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

निवडणुकीच्या प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जाण्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, या निवडणुकीत मुंबईच्या खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 25, 2025 | 06:34 PM
मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीच्या प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा
  • मुंबईच्या खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी
  • फराळाच्या नावाने द्वेष वाटत आहेत.
मुंबई : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जाण्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, या निवडणुकीत मुंबईच्या खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.

सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे, “प्रत्येक निवडणुक आली तर भाजपाकडून ध्रुवीकरणाच्या अजेंडा राबवला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हेच पाहिले. हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे सारख्या घोषणा देतात. किंवा यांचे सर्व नेते द्वेष पूर्ण वक्तव्ये करतात. आताही मुंबई महानगरपालिका निवडणूक आली आणि फराळाच्या पिशव्यांतून घरात घरात शुभेच्छा देण्याऐवजी फराळाच्या नावाने द्वेष वाटत आहेत.

तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता MMRDAकडून भूसंपादन सुरू

त्यांनी पुढे मुंबईकरांना आवाहन केले की, या निवडणुकीत धर्म, भाषा यांसारखे वाद चालू द्यायचे नाहीत. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई शहराचा बकालपणा कसा कमी करणार, नालेसफाई, दरवर्षी भरणाऱ्या पाण्यावर, पालिका रुग्णालयांच्या दुरावस्थेवर, शाळांच्या अव्यवस्थेवर, फुटलेल्या गटारांवर, संडासांच्या टाक्यांवर, महिलांसाठी अपुऱ्या व गलिच्छ शौचालयांवर, उध्वस्त फुटपाथांवर, खड्ड्यांवर, त्यात पडून मरणाऱ्या माणसांवर, प्रचंड ट्राफिकवर, कचऱ्यावर, खुल्या जागांवर, बिल्डरांच्या मनमानीवर, सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदारांशी असलेल्या संगनमतावर, पालिकेतील दलालांवर, बेफिकीर व्यवस्थापनावर, भ्रष्टाचाराच्या दलदलीवर, महायुतीने केलेल्या लुटीवर, वाढत्या कराच्या बोज्यावर, महापालिकेच्या आर्थिक दुर्द़शेवर ही चर्चा होईल.

“मुंबईकरांनो, देशाची आर्थिक राजधानी मुंबई प्रचंड आजारी आहे. मुंबई वाचवायची असेल तर मुंबईच्या तब्येतीची चर्चा करु, मुंबईकरांवरील प्रचंड तणावाची चर्चा करुया..त्यांचे जीवन कसे सुसह्य होईल यावर चर्चा करुया,” असे सावंत म्हणाले. यासाठी काँग्रेस पक्षाने मुंबईकरांच्या हितासाठी, मुंबईला खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पण संवेदनशील व माणसाच्या जीवनाची किंमत असलेले शहर बनविण्यासाठी भाजपाचा ध्रुवीकरणाचा अजेंडा हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी काय म्हटलं?

प्रत्येक निवडणुक आली तर भाजपाकडून ध्रुवीकरणाच्या अजेंडा राबवला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हेच पाहिले. हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे सारख्या घोषणा देतात. किंवा यांचे सर्व नेते द्वेष पूर्ण वक्तव्ये देतात. आताही मुंबई महानगरपालिका निवडणूक आली आणि फराळाच्या पिशव्यांतून घरात घरात शुभेच्छा देण्याऐवजी फराळाच्या नावाने द्वेष वाटत आहेत. आता बस! या निवडणुकीत धर्म, भाषा हे वाद चालू द्यायचे नाहीत. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे.

प्रत्येक निवडणुक आली तर भाजपाकडून ध्रुवीकरणाच्या अजेंडा राबवला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हेच पाहिले. हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे सारख्या घोषणा देतात. किंवा यांचे सर्व नेते द्वेष पूर्ण वक्तव्ये देतात. आताही मुंबई महानगरपालिका… https://t.co/dnBuFS4qju — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 25, 2025

मुंबई शहराचा बकालपणा कसा कमी करणार ते सांगा? चर्चा मुंबईतील नालेसफाईवर होईल, दरवर्षी भरणाऱ्या पाण्यावर होईल, पालिका रुग्णालयांच्या दुरावस्थेवर , शाळांच्या अव्यवस्थेवर, फुटलेल्या गटारांवर,संडासांच्या टाक्यांवर, महिलांसाठी अपुऱ्या व गलिच्छ शौचालयांवर, उध्वस्त फुटपाथांवर, खड्ड्यांवर, त्यात पडून मरणाऱ्या माणसांवर, प्रचंड ट्राफिकवर, कचऱ्यावर, खुल्या जागांवर, बिल्डरांच्या मनमानीवर, सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदारांशी असलेल्या संगनमतावर, पालिकेतील दलालांवर, बेफिकीर व्यवस्थापनावर, भ्रष्टाचाराच्या दलदलीवर ,महायुतीने केलेल्या लुटीवर होईल, वाढत्या कराच्या बोज्यावर, महापालिकेच्या आर्थिक दुर्द़शेवर होईल.. मुंबईकरांनो, देशाची आर्थिक राजधानी मुंबई प्रचंड आजारी आहे. मुंबई वाचवायची असेल तर मुंबईच्या तब्येतीची चर्चा करु, मुंबईकरांवरील प्रचंड तणावाची चर्चा करुया..त्यांचे जीवन कसे सुसह्य होईल यावर चर्चा करुया. यासाठी यावेळी काँग्रेस पक्षाने मुंबईकरांच्या हितासाठी, मुंबईला खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पण संवेदनशील व माणसाच्या जीवनाची किंमत असलेले शहर बनविण्यासाठी भाजपाचा ध्रुवीकरणाचा अजेंडा हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे.

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; एक-दोन नव्हेतर तब्बल 154 प्राणी जप्त

Web Title: Sachin sawant on in the mumbai municipal elections there should be solutions to mumbai problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • sachin sawant

संबंधित बातम्या

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
1

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?
2

Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘सेंट्रल पार्क’ वादाच्या भोवऱ्यात! १०२ वास्तुविशारदांचा भूमिगत बांधकामाला तीव्र विरोध
3

Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘सेंट्रल पार्क’ वादाच्या भोवऱ्यात! १०२ वास्तुविशारदांचा भूमिगत बांधकामाला तीव्र विरोध

Central Railway : ‘…म्हणून लोकल उशीराने धावते’, दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने
4

Central Railway : ‘…म्हणून लोकल उशीराने धावते’, दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.