Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milind Deora letter to CM : दक्षिण मुंबईत आंदोलन करण्यास होणार बंदी? जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Milind Deora letter to CM : शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा आंदोलन न होऊ देण्याबाबत पत्र लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 04, 2025 | 04:00 PM
Shivsena mp Milind Deora letter to CM devendra fadnavis for Protests banned in South Mumbai

Shivsena mp Milind Deora letter to CM devendra fadnavis for Protests banned in South Mumbai

Follow Us
Close
Follow Us:

Milind Deora letter to CM : मुंबई : मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला. जरांगे पाटील यांच्यासह हजारो समर्थक हे अंतरवली सराटीहून मुंबईमध्ये दाखल झाले. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केल. यावेळी दक्षिण मुंबईमध्ये हजारो मराठा समर्थक हे जमा झाले होते. त्यांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. आंदोलन संपल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. यानंतर आता शिंदे गटाच्या खासदारांनी दक्षिण मुंबईत आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तसेच रस्त्यावर सर्वत्र कचरा देखील साचला होता. यामुळे नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी वारंवार होणाऱ्या निदर्शने आणि मोठ्या संख्येने होणाऱ्या मेळाव्यांबद्दल मी तुम्हाला खोलवर चिंता व्यक्त करत लिहित आहे. निषेध करण्याचा अधिकार हा एक आवश्यक लोकशाही स्वातंत्र्य असला तरी, तो सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या आणि व्यत्ययाशिवाय काम करण्याच्या अधिकारांशी समतोल राखला पाहिजे.

दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदयच नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. येथे महाराष्ट्र सरकारचे सचिवालय (मंत्रालय), विधानसभा, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये तसेच पश्चिम नौदल कमांड आहे. ते वित्तीय संस्था, कॉर्पोरेट मुख्यालय आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र देखील आहे ज्यावर लाखो लोक दररोज अवलंबून असतात.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जगातील कोणतेही राजधानी शहर आपल्या प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना वारंवार निदर्शनांमुळे अपंग होऊ देत नाही. शांततापूर्ण निदर्शने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, त्यांचे स्थान आणि प्रमाण सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खाजगी क्षेत्राच्या कामकाजाला कमकुवत करू नये.

In light of the recent protests that brought #Mumbai to a near standstill, I’ve written to CM @Dev_Fadnavis ji.

While every Indian has the right to protest, SOPs must ensure that #Maharashtra’s political & economic nerve centre is not paralysed.@mieknathshinde pic.twitter.com/YPbVxEvzcE

— Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) September 4, 2025

म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी दक्षिण मुंबरच्या उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. यामुळे नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील, प्रशासनात व्यत्यय येईल आणि मुंबई महाराष्ट्र आणि भारताची निर्विवाद आर्थिक आणि राजकीय राजधानी म्हणून कार्यरत राहील, असे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.

Web Title: Shivsena mp milind deora letter to cm devendra fadnavis for protests banned in south mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 04:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.