Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रशासनाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा विसर, ही गंभीर बाब’; सुप्रिया सुळे यांचं विधान

राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील, याबाबत माहिती नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 25, 2025 | 03:05 PM
'राज्याच्या तिजोरीची चावी जनतेच्या हातात';

'राज्याच्या तिजोरीची चावी जनतेच्या हातात';

Follow Us
Close
Follow Us:

कराड : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगात असताना सत्ताधारी-विरोधकांकडून टीकाटिप्पणी सुरू असते. मात्र, राज्याच्या तिजोरीची चावी कोणत्याही नेत्याकडे नसून, ती पूर्णपणे जनतेकडे आहे; लोकशाहीत हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनव्यवस्थेतील जनतेच्या सर्वोच्च भूमिकेवर भर दिला.

यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘निधीच्या चाव्या’ संदर्भातील अलीकडील वक्तव्यांचा उल्लेख करताना त्या माध्यमांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, हिमालय अडचणीत असताना सह्याद्री धावून गेला होता. देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही. परंतु, त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे प्रशासनाने यावर्षी केलेले दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे.

तसेत त्या पुढे म्हणाल्या, ‘या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सरकारे येतात-जातात, पण काही परंपरा पाळायलाच हव्यात. चव्हाण साहेबांचा योग्य मानसन्मान राखणे ही राज्याची जबाबदारी आहे’.

…ते कामात व्यस्त असतील

राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील, याबाबत माहिती नाही. परंतु प्रशासन मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळण्यास बांधील आहे. यावेळी प्रशासनाकडून झालेली चूक प्रकर्षाने जाणवते.

साताऱ्यात भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला

साताऱ्यात भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला, या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही. त्यांचा मूळ पक्ष मलाही नीट आठवत नाही, अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनीही या पार्श्वभूमीवर विधान करत म्हटले, दोन्ही राजांच्या भूमिकेबद्दल मी बोलत नाही. पण एक महिला सक्षमपणे उभी असून, त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यामुळे जनताच योग्य कोण ते ठरवेल, असे मत व्यक्त केले.

हेदेखील वाचा : Local Body Election 2025 : लियाकत शाह यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद! चिपळूणच्या राजकारणात घडतंय तरी काय?

परळीतील सभेत धनंजय मुंडेंनी आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ज्या व्यक्तींनी कोणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या एका लेकीची क्रूर हत्या केली, अशा लोकांची आठवण एखाद्या नेत्याला होत असेल, तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे.

Web Title: The administration has forgotten yashwantrao chavan saheb this is a serious matter says mp supriya sule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • supriya sule

संबंधित बातम्या

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; शरद पवार गटात दुफळी तर ठाकरे गटात…
1

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; शरद पवार गटात दुफळी तर ठाकरे गटात…

‘आम्ही फक्त विकासावरच बोलतो’; माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भालकेंना टोला
2

‘आम्ही फक्त विकासावरच बोलतो’; माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भालकेंना टोला

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचे आकस्मिक निधन
3

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचे आकस्मिक निधन

‘भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की…’; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
4

‘भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की…’; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.