Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीत नेमकी काय चुका झाल्या? भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट केलं स्पष्ट

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच घटक पक्षांची चाचपणी आणि प्रचार सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी सरस ठरली. त्यामुळे आता विधानसभेसाठी महायुती जोरदार तयारी करत आहे. लोकसभेमध्ये नेमकं काय झालं याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत मांडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 13, 2024 | 01:03 PM
Chandrashekhar Bawankule on loksabha elections

Chandrashekhar Bawankule on loksabha elections

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सर्व नेत्यांच्या सभा, बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूका पार पडल्या. यावेळी भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने विधानसभेसाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये नेमक्या काय चुका झाल्या याबाबत आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत देशाचे मुद्दे बाजूला राहिले आणि निवडणूक लोकल मुद्यांवर लढली गेली. संसदेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसारखी झाली. ग्रामपंचायतीचे मुद्दे आणि नगरपालिकेचे मुद्दे त्या निवडणुकीत आले होते. महाविकास आघाडीने भाजपा संविधान बदलणार आहे, अशा प्रकारचा प्रचार केला. मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली. तसेच राहुल गांधींनी सांगितलं की त्यांचे खासदार निवडून आले तर खटाखट खटाखट पैसे देऊ. याचा अर्थ त्यांनी संभ्रम तयार केला. जनतेला खोटे बोलून मतदान घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. आताही राहुल गांधी यांच्या एका विधानावरून असं दिसतं आहे की त्यांची मानसिकता आरक्षण संपवण्याची आहे” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे.

पुढे बावनकुळे म्हणाले की, “आम्ही जनतेची कामे करतो, तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की आम्हाला मते मिळतील. मात्र, मते मिळाली नाहीत, त्यानंतर आम्हीही त्याच्या खोलात गेलो. लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो आहोत, त्यामधून काही शिकलोही आहोत. मात्र, आमची ती चूक दुरुस्त करून आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देशाची निवडणूक स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसारखी होईल याचा आम्हाला अंदाज आला नाही. खरं तर आम्ही निवडणुकीचा अंदाजच घेतला नाही. निवडणूक अशाच मुद्यांवर फिरत राहिली. त्यामुळे आम्हाला आता अंदाज आला आहे की, निवडणुकीत काय झालं? हे मान्य आहे की काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. विरोधकांकडून लोकल मुद्दे मांडण्यात आले. मात्र, आम्हीही याचाही अंदाज घेऊ शकलो नाही. 12 जागा आमच्या थोडक्यात गेल्या. परिस्थिती एवढी घासून होईल याचा अंदाज आला नाही” अशी कबुली चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या एकत्रित लढण्यावर आणि अजित पवार यांच्याबाबत देखील मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,”महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. आम्ही ज्या विचारांवर पक्ष चालवतो त्या पक्षाचे वेगळे विचार आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशासाठी आहोत? देशातील आणि महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष जर महायुतीच राहिलं तर महाराष्ट्राला विकासाठी फायदा होईल. “महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना महत्वाच्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर हे सर्व योजना बंद करतील. मी द्याव्याने सांगतो. कारण कर्नाटकमध्ये त्यांनी सर्व योजना बंद केल्या आहेत,” असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: The bjp state president made it clear directly that what exactly went wrong in the lok sabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • BJP
  • elections
  • lok sabha

संबंधित बातम्या

प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व; 13 जागांवर बिनविरोध निवड
1

प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व; 13 जागांवर बिनविरोध निवड

महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान
2

महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण, तर भाजप आक्रमक
3

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण, तर भाजप आक्रमक

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?
4

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.