
गेम होणार अन् बिहारमध्ये 'चाणक्य' भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच...; BJP Cचा 'हा' नेता...
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना आला वेग
अमित शहा यांनी भाजप नेत्याला दिल्लीत बोलावले
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुख्यमंत्री होण्याची शक्यता
Amit Shaha Meet DCM Samrat Choudhary: बिहार राज्यात राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केल्यावर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारचा नवीन मुख्यमंत्री हा भाजपचा असण्याची शक्यता वर्तवली आहे.
अमित शहा यांनी सम्राट चौधरी यांना दिल्लीला का बोलावले आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघांमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यानंतर सम्राट चौधरी हे मोठे नेते समजले जातात. ते सध्या बिहारचे गृहमंत्री देखील आहेत.
नवीन मुख्यमंत्री कोण होणार?
विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आहेत. राज्यसभेवर गेल्यावर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप नेतृत्वाने याबाबत चर्चा सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. येत्या 16 मार्चला बिहारमधील 5 जागांसाठी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे.
Bihar Politics : बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त! मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर
बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त!
नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होत दिल्लीचा मार्ग स्वीकारला आहे. नीतीशकुमार हे राज्यसभेवर जाणार असल्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या बदलांची चर्चा रंगली आहे. नवीन सरकार स्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यसभेत प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे नवीन सत्ताप्रणालीबाबत चर्चा वाढली आहे. जर त्यांनी असे केले तर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल असे म्हटले जात आहे आणि त्यासाठीचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाऊ शकते. याचा अर्थ असा की यावेळी भाजप मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मित्रपक्ष जेडीयूला उपमुख्यमंत्र्यांसह अंदाजे १५ मंत्रिपदे मिळू शकतात. असे वृत्त आहे की या फॉर्म्युल्यानुसार, भाजपला मुख्यमंत्र्यांसह अंदाजे १५ मंत्रिपदे मिळू शकतात, तर जेडीयूला एक उपमुख्यमंत्री आणि १५ मंत्रिपदे मिळण्याची चर्चा आहे.