Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Interview : “बोले तैसा चाले त्याची…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवरुन उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी

Uddhav Thackeray Interview : खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरबाबत देखील मत व्यक्त केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 20, 2025 | 01:54 PM
Uddhav Thackeray Interview by mp sanjay raut on narendra modi retirement

Uddhav Thackeray Interview by mp sanjay raut on narendra modi retirement

Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray Interview : मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर धारावी प्रकल्प, मुंबई निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत देखील प्रश्न केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत देखील मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रश्न केला. यावेळी ते म्हणाले की, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. म्हणून 370 हटवण्याबाबत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. या हल्ल्यावेळी बेफिकरी आणि गाफिलपणा झाला त्याची जबाबदारी कोणीच घेतली नाही. सैन्याच्या कारवाईला आणि शौर्याला सलाम आहे. त्यामध्ये काहीच वाद नाही. परंतू ज्या बिंधास्तपणे पर्यटक गेले होते त्यांच्यावर गोळीबार झाला याला जबाबदार कोण आहे? तीन महिने झाल्यानंतर देखील या अतिरेक्यांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. अतिरेकी येऊन मारुन गेले. पण गेले कुठे? हे सरकारचं अपयश आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ऑपरेशन सिंदूरला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता मात्र अजूनही त्याचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यावेळी परिस्थिती अशीच होती. उद्या पाकिस्तानला आपण मोडू टाकू अन् आपलं स्वप्न पूर्ण होईल असं वाटत होतं. मात्र नंतर असं काय घडलं की सैन्याचे पाय तुम्ही मागे ओढले हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. सैन्याची पराक्रम करत आतमध्ये घुसलं होतं मात्र त्यांना थांबवलं गेलं. आपल्या सैन्याच्या शौर्यावर स्वप्नामध्ये सुद्धा संशय घेता येणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे सातत्याने सांगत आहे की त्यांनी युद्ध थांबवलं म्हणून. व्यापारासाठी थांबवलं असं सांगितलं जात आहे. त्यांना देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटत आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीचा व्यापार, सत्तेचा व्यापार आणि आता देशाचाही व्यापार करत आहेत. हे कचखाऊ नेतृत्व आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी निवृत्तीबाबत संकेत देणारे वक्तव्य केले होते. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्तीचे संकेत दिले जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपला पंतप्रधान आहेत पण देशाला पंतप्रधान नाहीत. नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीची शाल मोहन भागवत यांनी घातलेली आहे. आता बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पावले आहेत ते कळेल आता. मोहन भागवतही निवृत्त होण्याच्या विचारात आहेत अशावेळी मोदी शब्द पाळतील का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे म्हणतात, आता यांची पावलं वाकडी पडतात का? ते कळेल,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Web Title: Uddhav thackeray interview by mp sanjay raut on narendra modi retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
1

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
2

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
3

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
4

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.