Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं अशी इच्छा…”; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. आठवले यांनी आमदार रोहित पवार व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2025 | 06:46 PM
Union Minister Ramdas Athawale targets Raj Thackeray and Rohit Pawar

Union Minister Ramdas Athawale targets Raj Thackeray and Rohit Pawar

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : काल (दि.22) जळगावमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. आग लागल्याची अफवा पसरवून प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमींची संख्या देखील वाढत आहे. ष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. जळगाव रेल्वे अपघातावर आठवले म्हणाले की,  रेल्वे अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे. जळगावमध्ये झालेली ही घटना मनाला चटका लावणारी आहे. यापुढे रेल्वे अपघात होऊ नये याची रेल्वेमंत्र्यांनी दक्षता घ्यावी. अपघातात मृत्युमुखी आणि जखमींना सरकारी मदत जाहीर केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौरा केला आहे. यामध्ये अनेक कोट्यवधी सामंजस्य करार करण्यात आले. मात्र भारतीय कंपन्यासोबत करार केल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. तसेच पालकमंत्रिपदाच्या वादावरुन देखील त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. रामदास आठवले म्हणाले की, “तुमचे सरकार येईल तेव्हा तुम्ही तीन ते चार पालकमंत्री द्या. पालकमंत्री पदासाठी वाद नाही. सर्वांना वाटत पालकमंत्री बनावं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं अशी इच्छा त्यांचे स्वागत आहे. शरद पवार आमच्या NDA सोबत यायला पाहिजे,” असे सूचक विधान रामदास आठवले यांनी केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न देण्याची मागणी केली. वीर सावरकर यांना भारतरत्न दिले नाही आता बाळासाहेब ठाकरे यांना तरी द्यावे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर रामदास आठवले म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे मराठी मनाचे हृदय सम्राट आहेत. शिव शक्ती आणि भीम शक्ती एकत्र यावी ही त्याची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळत असेल तर हरकत नाही. मी मागणी करेल पण संजय राऊत पण आहेच. राज ठाकरे नाशिकला आहे. आमच्या भेटी होत असतातच आणि आम्ही दोघे चांगले मित्र आहोत,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

मनसेने दादागिरी करणे चुकीचं

शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याबाबत रामदास आठवले म्हणाले की, “शाळेत मराठी भाषा विषय असला पाहिजे. कोणतेही बोर्ड असावे. मनसेकडून काही धोरणं चुकीचे आहे. मराठी बोलले पाहिजे. हे चुकीचं आहे. मराठीच बोलले पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. उत्तर भारतीयांनी मराठीवर अन्याय केला हे समजणे चुकीचे आहे. मनसेने दादागिरी करणे चुकीचं आहे. मराठी बोर्ड असावे हे बरोबर पण मुंबई अखंड राहावी ही आमची इच्छा आहे. राज ठाकरे म्हणाले होते रामदास आठवले मंत्री झाले पण त्यांना पक्ष बरखास्त कराव लागेल. पण त्यांच्यावर आता तशी वेळ येऊ नये,” असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Web Title: Union minister ramdas athawale targets raj thackeray and rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • raj thackeray
  • Ramdas Aathvale

संबंधित बातम्या

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
1

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
3

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी
4

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.