Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: या राशीच्या लोकांना अनेकदा लागते नजर, काय आहेत ज्योतिषशास्त्रीय कारणे

नजर ही एक अदृश्य अशी शक्ती आहे. यामुळे व्यक्तीला अनेक अडथळे आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात होतो. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 14, 2025 | 09:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिषशास्त्रामध्ये नजर लागणे, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणे यांसारख्या गोष्टींना गंभीर मानले जाते. कारण या गोष्टींचा नकळत परिणाम आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे काही राशीच्या लोकांना अडथळे आणि समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळी मानसिक ताण, आजार, आर्थिक समस्या किंवा नुकसान होणे यांसारख्या गोष्टी नजर लागल्यास कारणीभूत ठरतात. ज्या लोकांना वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेचा त्रास होतो त्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागते.

काही राशीच्या लोकांना संवेदनशीलता आणि आकर्षणामुळे देखील परिणाम होतो. या लोकांचा स्वभाव मनमोकळा असल्याने हे लोक लवकर नकारात्मक ऊर्जेचे बळी पडतात. यामुळे या लोकांना जीवनामध्ये अनेक अडथळे आणि समस्येचा सामना करावा लागतो. कोणत्या राशीच्या लोकांना नजर आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागतो, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीचे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात. यांच्यामधील सहजता आणि मनमोकळेपणा त्यांना लोकांच्या जवळ आणतो यामुळे ते नकारात्मक ऊर्जेचे बळी पडले जाते, असे म्हटले जाते. या लोकांवर जेव्हा वाईट नजरेचा प्रभाव असतो तेव्हा त्या लोकांना चिंता, ताणतणाव आणि मूड स्विंग्ससारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्वांमुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊन त्यांना कोणतेही काम करण्यात रस राहत नाही. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून या लोकांनी घरामध्ये तुळशीची पाने ठेवावीत आणि त्याची काळजी घ्यावी. तसेच मानसिक शांतीसाठी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करतेवेळी करू नका ‘या’ चुका अन्यथा सामोरे जावे लागेल परिणामांना

कर्क रास

कर्क राशीचे लोक बाहेरून थोडे कठोर दिसतात पण आतून खूप मृदू स्वभावाचे असतात. या लोकांमध्ये भावनिकता जास्त असते. हे लोक स्वभावाने खूप प्रेमळ असतात त्यामुळे त्यांच्या लोक लगेच आकर्षित होतात. या सर्व कारणांमुळे ते वाईट नजरेस बळी पडतात असे म्हटले जाते. या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो ते मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि भावनिक होतात. त्यामुळे या लोकांनी कडुलिंबाचे नियमित सेवन करणे तसेच घरामध्ये कडुलिंबाची पाने ठेवणे खूप फायदेशीर ठरते. या लोकांनी शनि देवाची नियमित पूजा केल्यास सर्व समस्येतून आराम मिळतो. तसेच काळ्या रंगांच्या वस्तू परिधान करणे किंवा घरामध्ये ठेवणे फायदेशीर मानले जाते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोक स्वभावाने बुद्धिमान, तीक्ष्ण मनाचे असतात. मात्र या लोकांना जास्त विचार करणे, काळजी करणे यांसारख्या सवयींमुळे ते मानसिकरित्या अस्वस्थ राहतात. त्यामुळे हे लोक वाईट नजरेला लवकर बळी ठरतात. अस्वस्थता, निद्रानाश आणि शारीरिक कमजोरी यांसारख्या गोष्टींमुळे त्यांना वाईट नजरेच्या समस्यांना परिणामांना सामोरे जावे लागते. वाईट नजरेपासून सुटका मिळविण्यासाठी या लोकांनी दररोज गायत्री मंत्रांचा जप करावा. या लोकांनी काळे तीळ जाळणे आणि लिंबू-मिरची वापरणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचसोबत हळद आणि कापूर यांचे मिश्रण जाळून घरात ठेवल्यास हे लोक नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहतात.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांमध्ये नम्रता, सौम्यता या गोष्टी असतात. परंतु त्यांचा हा स्वभाव इतरांना कधीतरी त्रासदायक ठरतो. जेव्हा या लोकांवर वाईट नजरेचा प्रभाव पडतो तेव्हा या लोकांना थकल्यासारखे वाटते तसेच त्यांची सतत चिडचिड होते. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून या लोकांनी नियमितपणे हनुमान मंदिरात जाऊन पूजा करावी. कुठेही बाहेर जाताना काळे तीळ सोबत ठेवणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे घरात कापूर जाळल्याने घरात सकारात्मकता प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, मिळतील अपेक्षित फायदे

मीन रास

मीन राशीच्या लोकांमध्ये संवेदनशील, कल्पनाशील आणि आध्यात्मिकपणा खोलवर रुजलेला असतो. या लोकांच्या भावनेमुळे यांच्यात नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते. तसेच हे लोक वाईट नजरेचे देखील बळी पडतात. यांच्या शरीरामधील ऊर्जा कमी होते. या लोकांनी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करण्यासाठी काही उपाय केल्यास त्याचा जास्त परिणाम होतो. या लोकांनी घरामध्ये काही रोपे लावणे शुभ मानले जाते जसे की तुळस किंवा कडुलिंबाचे रोप. तसेच सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यान करणे फायदेशीर ठरते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Astro tips remedies for the impact of evil eye and negative energy on people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या
1

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर
2

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व
3

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा
4

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.