
फोटो सौजन्य- pinterest
१७ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी नागपंचमी देखील आहे. हा एक अद्भुत योग मानला जातो. आपल्या देशात नागपंचमीचा सण केवळ पूजेपुरता मर्यादित नाही. ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे.
लोक आपल्या कुंडलीतील काल सर्प दोष किंवा राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी सर्प देवाची पूजा केली जाते. पण कधीकधी आपण नकळत स्वयंपाकघरात अशा चुका करतो त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येतं.
विशेषतः या दिवशी लोखंडी तवे आणि कढई वापरल्याने घरातील शांतता आणि आनंद भंग होऊ शकतो. आपल्या घरातील वस्तूंचा थेट संबंध ग्रहांशी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळा लोखंडी तवा राहूचं प्रतीक मानला जातो तर स्टोची जळती ज्योत मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही नागपंचमीला तवा तापवता तेव्हा राहू आणि मंगळ ग्रह थेट एकमेंकाजवळ येतात. यामुळे घरातील सदस्यांमध्ये लहरीपणा, शुल्क गोष्टींवरून चिडचिड आणि विनाकारण भांडण होऊ लागतात, असे सांगण्यात येते. तर वास्तुशास्त्रानुसार नेहमी स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं. कारण ही अग्नीची दिशा आहे.
कढईचा आकार सापाच्या फण्यासारखा मानला जातो. लोखंड जास्त तापवल्यास एक वेगळ्या प्रकारची जड आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नागपंचमीच्या दिवशी कढई किंवा तवा तापवल्याने स्वयंपाकघराचे वास्तू संकलन बिघडते. याचा परिणाम प्रामुख्याने घरातील महिलांच्या आरोग्यावर होतो, असे म्हटले जाते. हे आर्थिक आणि आरोग्य दोन्हींसाठी हानिकारक ठरू शकतं. नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांडी तापवल्याने घरात आर्थिक अडचणींही येऊ शकतात.
जेव्हा स्वयंपाकघराचे वास्तू संकलन बिघडते आणि तेव्हा समृद्धी थांबते आणि अनावश्यक खर्च वाढतात म्हणूनच घरातील वडीलधारी माणसं सल्ला देतात या दिवशी पोळ्या भाजण्याऐवजी कोणतेही पदार्थ वाफवता किंवा उकडता येतील असे पदार्थ बनवावा. यामुळे स्वयंपाकघरात जास्त उष्णतेची गरज भासत नाही आणि वातावरण शांत राहतं.
जर तुमच्या कुंडलीत राहू केतू आणि कालसर्प दोष असेल तर या दिवशी स्वयंपाकघरातील लोखंडी भांडी बाजूला ठेवा. स्वयंपाकासाठी फक्त मातीची, पितळ्याची किंवा तांब्याची भांडी वापरा. आपल्या देशात नागपंचमीच्या आदल्या दिवशी तयार केलेली खीर, बाटी किंवा थंड पदार्थ खाण्याची जुनी परंपरा आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोखंडी तवा न तापवणं हे आहे. जर तुम्हाला राहूचा प्रभाव कमी करायचा असेल तर नागपंचमीच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये चांदी किंवा तांब्याच्या सापाची लहान जोडी टाका. यामुळे कालसर्प दोषांपासून रक्षणीय आराम मिळतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास या दिवशी तवा आणि तळणीचे भांड यांना स्पर्श करणं ही अंधश्रद्धा नसून घरातील राहूची दृष्टी दूर करण्याचा जुना आणि पारंपरिक मार्ग आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी तवा वापरणे टाळण्याची आणि तवा उलटा ठेवण्याची परंपरा आहे. यामागे नागदेवतेबद्दल आदर व्यक्त करण्याची धार्मिक आणि लोकमान्यता जोडलेली आहे.
Ans: काही कुटुंबांमध्ये या दिवशी तव्यावर पोळी किंवा भाकरी न करण्याची प्रथा आहे. ही प्रथा प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलते.
Ans: काही ज्योतिषीय मान्यतांमध्ये लोखंडी तवा आणि कढई यांचा संबंध राहूशी जोडला जातो. मात्र ही ज्योतिषीय मान्यता आहे; याला वैज्ञानिक आधार नाही