
ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, आपण ज्या तिथीला जन्म घेतो त्या तिथीची देवता आपल्य़ा प्रत्येक संकटातून वाट दाखवते. या देवतेसला अधिष्ठाता देव असतो. हा देव जन्म झाल्यापासून तुमचं प्रत्येक संकटातून संरक्षण करतो. मात्र असा कोणी देव असतो याची माहिती नसल्याने अनेकदा आपण कधीच यांची उपासना केलेली नसते. खरंतर तिथीनुसार असलेला हा रक्षक देव कोणता आणि तो ओळखायचा कसा तर तुमच्या जन्मपत्रिकेमधल्या तिथीनुसार.
जर तुमचा जन्म प्रतिपदेच्या तिथीला झाला असेल तर तुमचा रक्षक देव आहे ते म्हणजे अग्निदेव. अग्नीदेन तुम्हाला तुमच्या आयुष्यात साहस, धैर्य आणि ऊर्जा देतात. असं म्हटलं जातं. प्रत्येक परिस्थितीतून वाट काढण्याची जिद्द अग्नीदेव देतात.
द्वितीया ब्रह्मदेव : जर तुमता जन्म द्वितीया तिथीवर जन्मतात. ब्रम्हदेव म्हणजे सृजनशील आणि बुद्धीचं प्रतीक आहे. तुम्हाला शिक्षणात आणि करियरमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी मार्ग दाखवतात.
तृतीया — माता गौरी : तृतीयेला जन्मलेल्या लोकांची रक्षक देवता म्हणजे माता गौरी. जी या मंडळींच्या आयुष्यात प्रेम, सौंदर्य आणि सहनशीलता देते.
चतुर्थी — श्रीगणेश : गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. त्यामुळे श्री गणेश तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करतात.
पंचमी — नागदेवता : पंचमीला जन्मलेल्या मंडळींचं संरक्षण नागदेवता करते. जी संरक्षण आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं.
षष्ठी — कार्तिकेय : षष्ठीला जन्मलेल्या मंडळींची रक्षक देवता म्हणजे कार्तिकेय. जे तुम्हाला शौर्य आणि नेतृत्व करण्याची शक्ती देतात.
सप्तमी — सूर्यदेव : सूर्यदेव हे सप्तमीला जन्मलेल्या मंडळींचे रक्षक देवता आहे. हे तुम्हाला तेज आणि धैर्य देतात. सूर्यदेव तुम्हाला इतरांपेक्षा धाडसी आणि कणखर बनवतात.
अष्टमी — भगवान शिव : अष्टमीला जन्मलेल्या मंडळींची रक्षक देवता आहे ती म्हणजे भगवान शिव. महादेव परिवर्तन, शक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात.
नवमी — दुर्गा : शक्ती आणि विजय याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नवमीला जन्मलेल्या मंडळींना दुर्गादेवी वेळोवेळी मार्गदर्शन करते.
दशमी — यमदेव : न्याय आणि कर्मफळ देतात. तुमचं कर्म चांगलं ठेवा हेच कायम सांगण्याचा प्रयत्न करतात.
एकादशी/द्वादशी: —एकादशी आणि द्वादशीला जन्मलेल्या मंडळींना मार्ग दाखवण्याचं काम विष्णूदेव करतात. या मंडळींच्या आयुष्यात रक्षण आणि संतुलन आणतात.
त्रयोदशी: कामदेव — प्रेम आणि आकर्षण देतात. त्रयोदशीला जन्मलेली माणसं दिसायला आणि वागण्याच्या बाबतीत देखील मोहक असतात.
पौर्णिमा: चंद्रदेव — शांतता आणि स्थिरता तुमच्य़ा आय़ुष्यात आणतात. त्यामुळे पौर्णिमेला जन्मलेल्या लोकांनी चंद्रदेवांची आराधना करावी.
अमावस्या: पितृदेव — पितृदेव संरक्षण आणि आशीर्वाद प्रदान करतात. या दिवशी जन्मलेल्या माणसांना त्यांचा पितरांचा आशीर्वाद लाभतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)