Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांधारी कशी बनली श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीच्या विनाशाचे कारण, जाणून घ्या पौराणिक कथा

भगवान श्रीकृष्णाचे आवडते शहर म्हणजेच द्वारका. परंतु गांधारीच्या शापामुळे हे शहर नष्ट झाले. महाभारत युद्धात मारल्या गेलेल्या कौरवांची आई गांधारी होती. जाणून घेऊया पौराणिक कथा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 17, 2025 | 03:32 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

महाभारतामध्ये मुख्य पात्रांपैकी एक म्हणजे गांधारी. धृतराष्ट्राची पत्नी आणि कौरवांची आई म्हणून तिची ओळख. महाभारत युद्धात तिच्या सर्व 100 पुत्रांच्या मृत्युमुळे गांधारीला अपार वेदना सहन कराव्या लागल्या. महाभारताच्या युद्धात, कौरवांना भीष्म पितामह आणि गुरु द्रोण सारख्या अनुभवी योद्ध्यांनी पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे, पांडवांना भगवान श्रीकृष्णाने पाठिंबा दिला होता. भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार, पांडवांनी महाभारताचे युद्ध जिंकले आणि कौरवांचाही मृत्यू झाला.

श्रीकृष्णाला अपराधी का मानले

महाभारत युद्धात पांडवांना मदत करणे, त्यांना विजयी करणे आणि कौरवांच्या मृत्यूसाठी श्रीकृष्ण जबाबदार होते असे गांधारीचे मत होते. गांधारीचा असा विश्वास होता की, भगवान श्रीकृष्ण इच्छित असते तर महाभारत युद्ध झाले नसते आणि तिच्या मुलांचा मृत्यू देखील टळला असता, परंतु असे झाले नाही. त्यामुळे महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर गांधारीने रागाच्या भरात भगवान श्रीकृष्णाला शाप दिला की ज्याप्रमाणे माझे 100 पुत्र मृत्युमुखी पडले आहेत, त्याचप्रमाणे तुम्हीही एके दिवशी मराल.

Gemstone: शुक्राचे ‘हे’ रत्न कधी आणि कसे करावे परिधान

या शापामुळे द्वारिकेचा झाला नाश

आपल्या 100 पुत्रांच्या मृत्युच्या दुःखाने गांधारी क्रोधित झाली आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाली की जर मी खऱ्या मनाने भगवान विष्णूची पूजा केली असेल तर मी तुम्हाला शाप देते की जसे माझे कुळ नष्ट झाले आहे, त्याचप्रमाणे, तुमच्या घराण्याचा नाश तुमच्या डोळ्यासमोर होईल आणि तुम्ही फक्त पाहत राहाल. गांधारीचे हे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, आई, मी तुझ्याकडून या आशीर्वादाची वाट पाहत होतो. तुमचा हा शाप मी स्वीकारतो. त्यानंतर, युधिष्ठिराचा राज्याभिषेक करून श्रीकृष्ण द्वारका नगरीला परत गेले. महाभारत युद्धानंतर काही वर्षांनी गांधारीचा शाप खरा ठरला आणि संपूर्ण द्वारका शहर पाण्यात बुडाले, असे मानले गेले.

मिथुन राशीच्या लोकांसह या राशीची लोक खोटं बोलण्यात असतात माहीर

दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार, एकदा महर्षी विश्वामित्र, देव ऋषी नारद, कण्व द्वारकेला गेले, तेव्हा यादव वंशातील काही मुलांनी ऋषींची थट्टा करण्यासाठी श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला एका महिलेच्या वेशात नेले आणि ऋषींना सांगितले की ही स्त्री गर्भवती आहे. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल मला सांगा, ते जन्माला येईल का? जेव्हा ऋषीमुनींनी स्वतःचा अपमान होत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी तिला शाप दिला की तिच्या पोटातून एक मुसळ जन्माला येईल आणि तो मुसळ संपूर्ण यदुवंशी कुळाचा नाश करेल.

त्यानंतर सर्व यदुवंशी आपापसात लढू लागले आणि मरू लागले. सर्व यदुवंशींच्या मृत्युनंतर, बलरामानेही आपले शरीर सोडले. एका शिकारीने कृष्णाला हरिण समजून त्याच्यावर बाण सोडला, ज्यामुळे भगवान कृष्ण स्वर्गात गेले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Gandhari contribution to the fall of dwarika a story from hindu mythology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • dharm
  • Mahabharata facts
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

Som Pradosh Vrat 2025: 17 की 18 कधी आहे सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
1

Som Pradosh Vrat 2025: 17 की 18 कधी आहे सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Surya Gochar 2025: सूर्याचे वृश्चिक राशीतून होणाऱ्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
2

Surya Gochar 2025: सूर्याचे वृश्चिक राशीतून होणाऱ्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Stock Market Astrology: ग्रहांच्या हालचालींचा शेअर बाजारावर कसा होतो परिणाम, जाणून घ्या
3

Stock Market Astrology: ग्रहांच्या हालचालींचा शेअर बाजारावर कसा होतो परिणाम, जाणून घ्या

Surya-Budh Yuti 2025: सूर्य आणि बुधाच्या युतीने या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Surya-Budh Yuti 2025: सूर्य आणि बुधाच्या युतीने या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.