
फोटो सौजन्य- pinterest
शिमगाचा उत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. होळी आणि शिमगोत्सवाच्या काळात कोकण भागात विशेषतः ज्याचे नाव आदराने घेतले जाते तो म्हणजे संकासूर. संकासूर हा एक असुर होता. कोकणातील लोकपरंपरेत संकासूराला नाट्यरूपात सादर केले जाते आणि त्याला विशिष्ट मान दिला जातो. शिमगोत्सवातील लोकनृत्य, वेशभूषा आणि संवादांमधून संकासुराचे पात्र साकारले जाते. हे पात्र वाईट प्रवृत्तीचे प्रतीक मानले जाते. कोण आहे हा संकासूर, त्याला एवढा मान का दिला जातो, जाणून घेऊया संकासूराविषयी
कोकणातील काही भागांमध्ये आणि गोव्यात संकासूराला होळीच्या काळात पूजन्याची पद्धत आहे. आता हा संकासूर कोणी देव नाही तरी त्याला होळीसारख्या पवित्र सणांच्या काळात मान दिला जातो. पुराव्यातील काही दाखलानुसार संकासूर हा ब्रम्हदेवांकडून वेद घेऊन पळाला. त्यानंतर देव आणि दानव्यांमध्ये तुंबळ असं युद्ध झालं. ज्यात दानवांचा पराभव झाला आणि वेद पुन्हा ब्रम्हांकडे आले. पण कोकणात मात्र असं मानलं जातं नाही त्याच्यामध्ये संकासूराने वेद हे पळवलेच नाही.
उलट जे चार वेद होते अनार्याचा राजा संकासूराचे होते. परंतु ब्रम्हदेवाने आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी ते आपल्याकडे ठेवले होते ते संकासूराने ब्रम्हदेवांकडून पळवले पण देव आणि दानवांच्या युद्धात ते पुन्हा ब्रम्हदेवांने आपल्याकडे ठेवले. म्हणूनच होळीत जिथे तिथे संकासूराची पात्र नाचवली जातात तेथील कोणत्याही नवनाथ संकासूराबाबत वाईट सांगितले जात नाही.
उलट संकासूर हा राजा होता आणि त्याने त्याची ही संपत्ती बहुजनामध्ये वाटली त्यामुळे त्याने ज्ञानदानाच मोठं काम केलं असं येथील लोक सांगतात. कोकणात याला गावाचं रक्षक असंही म्हणतात. होळीच्या दिवसात हातात काठी घेऊन हा संकासूर लोकांच्या पाठीत अलगद काठी मारतो हा एकप्रकारचा आशीर्वाद मानला जातो. त्याने काठीने मारावे यासाठी लोक त्याच्याजवळ सुद्धा जातात. या संकासूराला नवस ही केला जातो. नवस पूर्ण झाल्यावरती लोक मनोभावे नवस पूर्ण ही करतात, असा हा संकासूर दिसायला देवांसारखा नसला, त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसलं त्याचे दिसणं तेजस्वी नसलं तरी देखील त्याला खूप मान हे मात्र नक्की.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: संकासूर हा पौराणिक कथांमध्ये उल्लेख केलेला एक असुर मानला जातो. काही पुराणांनुसार त्याने वेद पळवले होते, तर कोकणातील लोकपरंपरेनुसार तो एक राजा होता.
Ans: कथेनुसार संकासूराने वेद पळवले आणि त्यानंतर विष्णू यांनी मत्स्य अवतार धारण करून वेदांची सुटका केली. काही कथांमध्ये वेद पुन्हा ब्रम्हा यांच्याकडे परत आल्याचे सांगितले जाते.
Ans: कोकण आणि गोव्यातील लोकमान्यतेनुसार संकासूर हा अनार्यांचा राजा होता. त्याने ज्ञान सर्वसामान्यांमध्ये वाटले, त्यामुळे त्याला ज्ञानदाता आणि लोकनायक मानले जाते.