Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन

सोमवार, 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला आयुष्याच्या एका टप्प्यावर कोणत्या देवीचा साक्षात्कार झाला होता. ती देवी माता कोण होती. त्यांचे जीवन कसे बदलून गेले हे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 12, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्वामी विवेकानंद हे कोणत्या देवीचे उपासक होते
  • स्वामीजींना कोणता साक्षात्कार झाला होता
  • त्यांनंतर त्यांचे जीवन कसे बदलून गेले.
 

12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे जन्म झालेले नरेंद्रनाथ दत्त पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षीच 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले होते. त्यानंतर जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे विचार विश्व मान्य झाले.

स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच देवभक्त होते. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता होती. नरेंद्र आणि त्यांचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र हे त्यांच्या मित्रांसोबत घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. नरेंद्र हे तर पूर्णपणे ध्यानमग्न झाले होते. तेवढ्यात एकाकडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्र यांच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले म्हणून भुवनेश्वरीदेवी म्हणजे स्वामींची आई येऊन पाहते तर काय ? नरेंद्र हे तसेच शांतपणे डोळे मिटून बसले होते. साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता. ही घटना त्यांची देवाबद्दलच्या चित्त एकाग्रतेचे दर्शन घडवते.

ओटी फक्त स्त्रियांचीच का भरतात ? पुरुषांची का नाही, जाणून घ्या यामागचं खरं कारण

स्वामी विवेकानंदांची काली माते वर असलेली दृढ श्रद्धा सर्वांना माहीत आहेच. स्वामी विवेकानंद लहानपणीच सर्व प्रथम काली मातेचा साक्षात्कार दक्षनेश्वरीमध्ये झाला होता. स्वामी विवेवकानंद यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त यांचे 1884 आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावरच कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वामी म्हणजेच नरेंद्र यांच्यावर येऊन पडली होती. नरेंद्र यांनी नोकरी केली, पण उपयोग झाला नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. नरेंद्र यांनी त्यावेळी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले. त्यांनी गुरूंना सर्व परिस्थिती सांगितली व कालीमातेस आपल्या समस्या सोडवाव्यात म्हणून प्रार्थना करण्याची विनंती केली. श्रीरामकृष्ण म्हणाले, मी मातेकडे सांसारिक गोष्टी मागू शकत नाही, हे तुला माहीत नाही का? तूच माग मातेकडून जे तुला हवं आहे ते. ती तुला नक्की देईल.

नरेंद्र हे कालीमातेच्या दर्शनाला जात होते. जणू कालीमाताच नरेंद्र यांना बोलावत होती. नरेंद्र हे कालीमातेपुढे नतमस्तक होऊन उभे राहिले, त्याला साक्षात कालीमाता दिसत होती. वात्सल्य भावनेने ती नरेंद्रकडे बघत होती. ते बघून नरेंद्र हे देहभान विसरले आणि त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला विवेक दे, वैराग्य दे! ज्ञान दे! भक्ती दे!

नरेंद्र हे भानावर आले आणि ते गुरूंकडे गेले आणि घडलेला प्रकार सांगितला. श्रीरामकृष्णांनी त्यांना पुन्हा मातेकडे पाठवले. पुन्हा पहिल्यासारखे घडले असे तीनवेळा घडले. नरेंद्र हे अन्न-वस्त्र, नोकरी, समृद्धी मागायला गेला होते, पण या सांसारिक गोष्टी न मागता विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती मागितली. संत तुकाराम महाराजांनीसुद्धा देवाकडे मागितले की, देवा विसर न व्हावा तसं लहान नरेंद्र यांनी सुद्धा मागितले.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

हा विवेकानंद यांना झालेला पहिला साक्षात्कार होता, यामुळे स्वामी विवेकानंद यांचे जीवनच येथून बदलून गेले. इथून पुढे त्यांनी माता कालीची मनोभावे उपासना सुरू केली. जगण्याचा अर्थच त्यांना जणू उमगला होता. 25, 26, 27 डिसेंबर 1892 तीन दिवस स्वामी विवेकानंद यांनी कन्याकुमारी येथील श्रीपाद शीला येथे ध्यान केले होते. माताने नेमलेल्या कार्याचा साक्षात्कार स्वामी विवेकानंदांना कन्याकुमारी येथे झाला होता. इथूनच उज्ज्वल जगतगुरू भारताचे चित्र स्वामीजींपुढे उभे राहिले होते.

सप्टेंबर 1899 मध्ये स्वामी विवेकानंद अमरनाथ दर्शन घ्यायला गेले असताना श्रीनगरमधील क्षीर भवानी मंदिरात गेले होते. तेथे स्वामी विवेकानंद यांनी माता कालीचे ध्यान करत समाधी लावली होती, आठवडाभर त्यांनी नवरात्रोत्सवात ध्यान केले होते. परमेश्वर भक्तीतून आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला स्पष्ट होतो व उपासना केल्याने त्यात साफल्य होण्यास मदत होते हे स्वामीजींच्या जीवनातून लक्षात येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वामी विवेकानंद हे कोणत्या देवीचे उपासक होते?

    Ans: स्वामी विवेकानंद हे माता कालीचे परम भक्त होते. त्यांनी कालीमातेला शक्ती, करुणा आणि सत्याचे प्रतीक मानले होते. त्यांच्या आध्यात्मिक जीवनात काली उपासनेला विशेष स्थान होते.

  • Que: माता कालीच्या साक्षात्कारावेळी स्वामी विवेकानंदांनी काय मागितले?

    Ans: त्यांनी अन्न, वस्त्र किंवा संपत्ती न मागता माता कालीकडे विवेक, वैराग्य, ज्ञान आणि भक्ती यांची याचना केली. हाच क्षण त्यांच्या जीवनातील निर्णायक वळण ठरला.

  • Que: स्वामी विवेकानंदांचे माता कालीवरील भक्तीचे महत्त्व काय आहे?

    Ans: माता कालीवरील भक्तीमुळे स्वामी विवेकानंदांना निर्भयता, आत्मविश्वास आणि त्यागाची प्रेरणा मिळाली. हीच भक्ती त्यांना विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी प्रवृत्त करत होती.

Web Title: How goddess kali transformed swami vivekanandas life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Swami Vivekananda

संबंधित बातम्या

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
1

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये
2

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व
3

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास
4

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.