
असं म्हणतात की, काही गोष्टी या लॉजिक आणि मॅजिकच्या पलिकडे असतात. मात्र अंधश्रद्धा म्हणायचं तर तसंही नाही. फक्त विज्ञानाला याची उकल झालेली नसते इतकंच. तर गोष्ट अशी की., कर्नाटकमध्ये असं एकमेव मंदिर आहे जिथली शिवपिंड पूर्णत: भस्मापासून बनलेली आहे आणि शेकडो वर्ष होऊन देखील ही शिवपिंड अगदी जशीच्या तशी आहे. यामागे देखील एक कारण आहे. तर आख्यायिका अशी की, कर्नाटकातीस पांगळा गावात भस्मापासून बनलेल्या या शिवपिंडीतून एक सुवास कायम दरवळत असतो. असं म्हणतात की हे भस्म कायमच ओलसर जाणवतं. तिकडे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या मते या शिवपिंडीच्या भोवती एक सकारात्मक शक्ती असल्याचा भास होतो. याबाबतचं रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञानांनी तिथल्या भस्माची तपासणी केली. त्यावेळी एक आश्चर्यकारक सत्य समोर आलं.
सहसा सर्वसाधारण भस्म वाऱ्याने उडून जातं. मात्र हे भस्म वर्षानुवर्ष तसंच टिकून आहे. असं भस्म टिकून राहण्यासाठी त्यात काही द्रव्य पदार्थ असतात. पण ते नेमके कोणते ते आजपर्यंत कोणालाही कळलं नाही. हे मंदिर पांगळा गावातील पांगळा या नदीकिनारी आहे. स्थानिक कथेनुसार, पूर्वी या परिसरात एक साधू कठोर तपश्चर्या करत होते. ते दररोज यज्ञ करून त्यातून निघालेलं पवित्र भस्म (विभूती) शिवपूजेसाठी वापरत असत. एके दिवशी त्या भस्माचा ढीग हळूहळू शिवलिंगाच्या आकारात स्थिरावला. त्यानंतर इथे भस्म साचून शिवपिंड तयार झाली अशी एक दंतकथा सांगितली जाते.
याचबरोबर या शिवपिंडींचं वैशिष्ट्यं म्हणजे या शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण केल्यावर ते पूर्णपणे विरघळत नाही.त्याचबरोबर या ठिकाणी विभूती अर्पण करण्याची परंपरा येथे विशेष महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जातं की, विभूती म्हणजे नश्वरतेचं प्रतीक. भगवान शिव भस्म धारण करतात, कारण जीवन क्षणभंगुर आहे, हा संदेश यातून मिळतो. त्यामुळे विभूतीपासून बनलेला शिवलिंग हा वैराग्य, शुद्धता आणि आत्मज्ञानाचं प्रतीक मानला जातो. आज देखील याचं वैज्ञानिक कारण कळू शकलं नाही पण येणाऱ्या भाविकांच्या मते या ठिकाणी दर्शन घेतल्यावर मानसिक शांतता आणि सकरात्मक ऊर्जा जाणवते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)