Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे प्रकट झाले ?

गुरुदेव दत्तांना मानणारा भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याच दत्तगुरुंचा कसे अतरले याबाबत आख्यायिका सांगितली जाते ती जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 19, 2025 | 04:06 PM
दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे प्रकट झाले ?
Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण सृष्टीचे पालहान म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महेश असल्याचं हिंदू धर्मात सांगितलं जातं. ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार म्हणजे श्री दत्तगुरु होय. हिंदू धर्मातील दत्त संप्रदाय अत्यंत मोठा आहे. नवनाथ देखील श्रीदत्तगुरुंचाच अंश असल्याचं म्हटलं जातं. गुरुदेव दत्तांना मानणारा भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याच दत्तगुरुंचा कसे अतरले याबाबत आख्यायिका सांगितली जाते ती जाणून घेऊयात.

दत्तसांप्रदायाला फार मोठी परंपरा असली तरी तिला संप्रदायाचे स्वरूप नरसिंह सरस्वतींच्या प्रभावामुळेच आले. असं म्हटलं दातं की, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे दत्तात्रयांचे पहिले अवतार असल्याचं म्हटलं जातं. नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार मानले जातात.
जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, अक्कलकोटकर स्वामी, वासुदेवानंद सरस्वती यांनी महापुरुषांनी संप्रदायाची परंपरा चालू ठेवली. दत्तांना मानणारा तरुण वर्गही तितकाच मोठा आहे.

श्री स्वामी समर्थ आणि औदुंबराचं झाड, काय आहे महत्त्व? औदुंबराची गाथा

दत्तात्रेय हे महान साधुपुरुष होते. या संप्रदायात शैव आणि वैष्णव तसेच हिंदू व मुसलमान धार्मीय देखील मोठ्या प्रमाणात आहेत. दत्तमाहात्म्य व दत्तप्रबोध ह्या ग्रंथांत ह्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान आले आहे. गुरुचरित्रात संप्रदायाचा आचारधर्म सांगितला आहे.अवधूतगीता, गुरुगीता व जीवन्मुक्तगीता ह्या ग्रंथांतून संप्रदायाची महती कळते. श्रीदत्तात्रयांच्या पुजेसाठी त्यांच्या मूर्तीऐवजी पादुकांना सर्वात जास्त महत्व दिलं जातं. औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर ह्या क्षेत्री दत्तात्रेयाच्या पादुकांची स्थापना केलेली आहे.

पांचाळेश्वर, नरसोबाची वाडी, माहूर, गाणगापूर, लाड कारंजे, कुरुगड्डी, गिरनार ही दत्तसंप्रदायाची प्रमुख क्षेत्रे होत. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात देखील दत्तसंप्रदाय मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो.नरसिंह सरस्वतींचा निवासस्थान गाणगापूर असल्याने कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विपुल प्रसार झाला. त्याचशिवाय दत्तगुरुचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ यांचं निवासस्थान अक्कलकोट असल्याने देखील महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय विपुल आहे.

Akkalkot : स्वामी समर्थांनी अक्कलकोट निवासस्थान का निवडलं?

दत्तसंप्रदायात गुरुचरित्राला मोठं महत्व आहे. मात्र मराठीतील हे गुरुचरित्र लिहिणारा गृहस्थ हा कानडी होता. आंध्रामधल्या दत्त संप्रदायाची माहिती वेंकटराव यांनी आपल्या लेखात दिली आहे. या संप्रदायाचा अभ्यास करायचा झाला तर अनेक ग्रंथ तेलगू भाषेत लिहिले गेले आहेत. गुजरातमधील गिरनार पर्वतावर श्रीदत्तांचा वास असल्याचं म्हटलं जातं. या ठिकाणी दत्तोपासनेची प्रेरणा घेतलेली बाबा किनराम अघोरी या नावाचा एक सत्पुरुष अठराव्या शतकाच्या होऊन गेले. गिरनार येथे मला दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला, असे त्याने आपल्या विवेकसार नावाच्या ग्रंथात लिहिलं आहे. त्याचबरोबर नर्मदा परिक्रमण देखील दत्तसंप्रदायाचाच एक भागल देखील आहे.

 

Web Title: How was the datta sampradaya created how did the original three incarnations of dattatreya appear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग
1

Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग

मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत
2

मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.