Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहू केतू निर्माण कसे झाले? काय आहे याची पुराणकथा ?

पत्रिकेत राहू किंवा केतूची दशा बदलली की अनेकांना याचा त्रास जाणवतो. सतत अडचणी निर्माण करणारे राहू आणि केतू नेमको कसे निर्माण झाले त्याची पुराण कथा जाणून घेऊयात. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 21, 2025 | 04:03 PM
राहू केतू निर्माण कसे झाले? काय आहे याची पुराणकथा ?
Follow Us
Close
Follow Us:

पत्रिकेत राहू किंवा केतूची दशा बदलली की अनेकांना याचा त्रास जाणवतो. सतत अडचणी निर्माण करणारे राहू आणि केतू नेमको कसे निर्माण झाले त्याची पुराण कथा जाणून घेऊयात. समुद्र मंथनाची कथा सर्वांनाच माहित आहे. ज्यातून चौदा रत्ने आणि अमृत निघालं होतं. दानवांचे गुरू शुक्राचार्य यांना संजिवनी विद्या प्राप्त असल्या कारणाने युद्धा मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. त्यामुळे देव कुळावरील संकट वाढतच जात होतं. अशावेळी सर्व देवगण अखेरीस ते भगवान विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली.त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला.

या मंथनातून लक्ष्मी, धन्वंतरी,चंद्र, कल्पवृक्ष, कामधेनू, उच्चैःश्रवा (घोडा), ऐरावत (हाथी) आणि विष (हलाहल) यांसारख्या गोष्टी बाहेर पडल्या, असे अनेक कथांमध्ये सांगितले आहे.देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. पण मंदारचलच्या खाली आधार नसल्याने, समुद्रात बुडायला लागलाते पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म (कासव) कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन तयार झाले. या मंथनातून आलेल्या अमृतासाठी देव आणि दानव यांच्यात वाद झाले होते. हे अमृत जो कोणी प्राशन करेन त्यांना अमरत्व प्राप्त होईल अशी या अमृताची महती होती. आपण देखील अमर व्हावं आणि देवांवर विजय मिळावावा या हेतूसाठी दानवांनी अमृताचा कलश पळवून नेला.

महाभारतातील मुख्य व्यक्ती जो कौरवांसाठी पांडवांशी लढला ; काय आहे देवव्रताची कहाणी ?

दानवांच्या या कृत्यामुळे देवकुळात चिंता निर्माण झाली. दानवांकडील अमृताचा कलश मिळवण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण केलं. या मोहिनी रुपाची भूरळ फक्त दानवांनाच नाही तर देवांनाही पडली. मोहिनी रुपावर भाळलेल्या दानवांनी मोहिनी जे आणि जसं सांगेल तसं ऐकलं. याच सगळ्याचा आधार घेत भगवान विष्णूने दानवांकडील अमृताचा कलश चतुराईने आणून देवांमध्ये हे अमृत वाटलं होतं. विष्णूने अमृत वाटताना त्यावेळी एका राक्षसाने चंद्रदेवांचं रुप घेतलं. काही वेळाने या राक्षसाचं पितळ उघड झालं. चंद्रदेव आणि इतर देवगणांनी राक्षसाचा खरा चेहरा समोर आणला. त्याला अमृत प्राशन करण्यापासून परावृत्त केलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता.

या राक्षसाच्या पोटात अमृताचा एक थेंब गेला होता. संतापलेल्या विष्णूने या राक्षसाचं धड आणि मान वेगळी केली. मात्र या सगळ्याचा परिणाम फार मोठा झाला नाही. राक्षसाच्या पोटात अमृताचा अंश गेल्याने त्याला मरण येणार नव्हतं. या राक्षसाचं मान आणि धड वेगळं केल्यानंतर ज्यांची निर्मिती झाली ते म्हणजे राहू आणि केतू. राक्षसाच्या मानेचा भाग म्हणजे राहू आणि त्याचं धड म्हणजे केतू. राहू आणि केतू हे भगवान विष्णूला घाबरतात असं पुराणात सांगितलं आहे. त्यामुळे जर पत्रिकेत राहू किंवा केतू अशुभ फल देत असल्यास भगवान विष्णूंची उपासना करणं फलदायी ठरतं. असं सांगितलं जातं.

Vastu Tips: धावणाऱ्या घोड्यांचा योग्य दिशेला फोटो लावल्यास करिअरला मिळेल गती

Web Title: How were rahu and ketu created what is the mythological story behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Vishnu
  • religion news

संबंधित बातम्या

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म
1

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य
2

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य

Surya Gochar 2025: सिंह राशीत होणार सूर्य गोचर, 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ; पैसाच पेसा येणार!
3

Surya Gochar 2025: सिंह राशीत होणार सूर्य गोचर, 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ; पैसाच पेसा येणार!

मृत्यूच्या १ तासाआधी शरीरात दिसून येतात हे ५ संकेत; जाणून घ्या गरुड पुराणातील ते आश्चर्य करणारं रहस्य
4

मृत्यूच्या १ तासाआधी शरीरात दिसून येतात हे ५ संकेत; जाणून घ्या गरुड पुराणातील ते आश्चर्य करणारं रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.