
फक्त जन्मपत्रिकाच नव्हे तर, माणसाचा चेहरा, देहबोली यांच्या वरुन देखील भविष्याचा आणि माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावला जातो. असच भविष्य वर्तवलं जातं ते हाताची सहा बोटं असणाऱ्यांचं. सर्वसाधारण हाताला पाच बोटं असतात. पण क्वचित असे आहेत ज्यांच्या हाताला सहा बोटं असतात. अशी सहा बोटं असणं शुभ असतं की अशुभ ते जाणून घेऊयात.
समुद्रीशास्त्र आणि हस्तरेखाशास्त्त्रानुसार, अशी मान्यता आहे की, हाताला सहा बोटं असणं हा शुभ शकुन मानला जातो. मात्र, आधुनिक हस्तसामुद्रिकांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आणि गूढ आहे.हस्तसामुद्रिक तज्ज्ञांच्या मते, असे लोक तंत्र-मंत्र, संमोहन, जादूटोणा आणि इतर गुप्त किंवा मायावी विद्यांमध्ये पारंगत असू शकतात.
सहावे बोट करंगळीच्या शेजारी असते.जर सहावे बोट करंगळीच्या शेजारी असेल, तर ती व्यक्ती जन्मजात मुत्सद्दी आणि त्यांच्याकडे इतरांपेक्षा जास्त अनुभवी असते, पण त्याचा एक तोटाही आहे.हे लोक एकाच ध्येयावर टिकून राहू शकत नाहीत. त्यांचे विचार आणि निर्णय हवामानाप्रमाणे बदलतात, ज्यामुळे त्यांचा खरा स्वभाव समजणं जवळजवळ अशक्य होतं.
अंगठ्याला जोडलेले सहावे बोट
जेव्हा सहावे बोट अंगठ्याला जोडलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता सामान्यपेक्षा जास्त असते. मात्र, असे लोक अनेकदा आपल्या बुद्धीचा गैरवापर करू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन, ज्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून जागतिक ओळख मिळाली.त्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून जागतिक ओळख मिळाली. त्याचा सहावं बोट म्हणजेच दुसरा अंगठा त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.