
फोटो सौजन्य- pinterest
चैत्र पौर्णिमेचा गुलाल उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध यात्रा महोत्सावांपैकी एक आहे. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होऊन ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात गुलालाची उधळण करतात. ज्योतिबा देव आणि गुलाल याचं नातं अतूट मानलं जातं. ज्योतिबाच्या यात्रेचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे डोंगरावर उधळला जाणारा गुलाल. भक्त चांगभलं असा जयघोष करत गुलाल उधळतात आणि संपूर्ण परिसर गुलाबी रंगांने न्हाहून निघतो. हे दृश्य अत्यंत आकर्षक आणि भक्तिमय मानला जातो. यामुळे संपूर्ण डोंगराचा रंग गुलाबी होतो म्हणूनच याला पिंक टेंपल असंही म्हणतात.
ज्योतिबा देवाच्या चरणी अर्पण केला जाणारा गुलाल हा अत्यंत पवित्र आणि विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो. हा गुलाल मुख्यत्वे नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांपासून बनतो. यात प्रामुख्याने लाल चंदन, डाळिंब्याच्या सुकवलेल्या साली आणि रोहतकाचे फूल जे गुलाला लाल रंग देतं. तर याचा बेस म्हणून आरारूट पावडर वापरली जाते. त्याला सुगंध जटामांसी या औषधी वनस्पतीमुळे येतो. त्यामुळे हा गुलाल औषधी गुणधर्मानी युक्त असतो. याचा कोणताही त्रास त्वचेला होत नाही. गुलाल उधळण्यामागे अनेक लोकश्रद्धा आणि कथा देखील सांगितल्या जातात. लोककथेनुसार, ज्योतिबा देवांनी राक्षसांवरती विजय मिळविल्यानंतर भक्तांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुलाल उधळला. त्या विजयाचं प्रतीक आणि उत्सवाचं प्रतीक म्हणून ही परंपरा पुढे सुरू राहिली. भक्तांचा असा विश्वास आहे, गुलाल उधळल्यामुळे वातावरण पवित्र होतं आणि देवदेवतांची कृपा होते. काही लोक गुलाल कपाळाला लावतात तर काहीघरी प्रसादासारखाही घेऊन जातात.
ज्योतिबा मंदिर परिसरात चैत्र महिन्यात भरवल्या जाणाऱ्या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. त्यावेळी गुलालाची इतकी उधळण होते की हा डोंगर गुलाबी दिसतो. ढोल ताशांचा गजर, चांगभलंचा जयघोष आणि हवेत उडणारा गुलाला त्यामुळे एक वेगळचं भक्तिमय वातावरण तयार होतं. असं म्हणतात, या चैत्र यात्रेनंतर हा गुलाल धुवून टाकण्यासाठी पाऊस ही हजेरी लावतो. त्यामुळे हा सगळा गुलाल धुवून निघतो. त्यामुळे ज्योतिबा देवाचं नाव घेतलं की गुलालाची आठवण ही नक्कीच होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: लोकश्रद्धेनुसार, ज्योतिबा देवांनी दुष्ट शक्तींवर विजय मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी गुलाल उधळण्याची परंपरा सुरू झाली.
Ans: उत्सवाच्या वेळी इतका गुलाल उधळला जातो की संपूर्ण डोंगर गुलाबी दिसतो, म्हणून त्याला “पिंक टेंपल” असेही म्हटले जाते.
Ans: गुलाल हा भक्ती, विजय आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. देवाच्या चरणी अर्पण केल्याने श्रद्धा व्यक्त होते.