बारावी परीक्षेच्या बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र हिंगोलीमधील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद असल्यामुळे अनोळखी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
सध्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत. यामध्ये नांदेडमधील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात जिद्दी विद्यार्थी सूरज शिवराज उबाळे हा पायाने पेपर लिहित होता. जन्मतः पाय नसलेल्या सूरजचा प्रवास प्रेरणादायी आहे.
मंगळवारी झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून सामूहिक काॅपी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली.
मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली नाशिक विभागात 285 केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहेत. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला.