
फोटो सौजन्य- pinterest
शिर्डीचे साईबाबा हे भारतातील सर्वाधिक पूजनीय संतांपैकी एक मानले जातात. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता मानवता, प्रेम, सेवा आणि ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. आजही लाखो भाविक साईबाबांच्या शिकवणुकीतून जीवन जगण्याची प्रेरणा घेतात. साईबाबांचे विचार हे केवळ धार्मिक उपदेश नसून, प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी जीवनमूल्ये आहेत. साईबाबांची प्रमुख तत्वे कोणती ते जाणून घ्या
सर्वांत पहिली शिकवण सर्वांवर समान प्रेम करा. धर्मांच्या पलीकडे जाऊन साईबाबांनी सर्वांवर प्रेम केले. यात प्राणीही होते. कबीर दासांपासून ते साईबाबांपर्यंत प्रत्येकाने प्रेमाला जीवनात सर्वोच्च प्राधान्य दिलं. जर एखादी व्यक्ती जीवनात कोणावरही प्रेम करू शकत नसेल तर त्या शहरांतील जीवन नक्कीच नरक बनेल. देवाने आपल्या सर्वांना निर्माण केलंय. मग देवानेच निर्माण केलेल्या गोष्टींचा द्वेष का करावा हीच त्यांची शिकवण होती.
दुसरी शिकवण म्हणजे क्षमा. साईबाबांनी केव्हाही कोणाबद्दल वैर बाळगलं नाही. शिर्डीतील काही पंडितांनी त्यांना विरोध केला होता तरीही त्यांनी त्यांना क्षमा केली. कोणाशीही त्यांनी कधीही वाद घातला नाही. एखाद्याच्या चुका माफ करणं हे मोठेपणाचं लक्षण मानलं जातं. लहान चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आपण वादात वाया जाणारा वेळ वाचवतो. हा वेळ आपण स्वतःच्या आणि जगाच्या विकासासाठी वापरू शकतो हेच त्यांनी शिकवलं.
तिसरी महत्त्वाची शिकवण म्हणजे मदत. असे म्हटले जाते, साईबाबांना त्यांच्या गुरूंनी एक पाकिट दिलं होतं. ज्याद्वारे ते लोकांना मदत करत असतं. त्या पाकिटातून ते सोन्याची नाणी काढून त्यांच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाला देत होते हे नाणं कधीही रिकामं नसायचं आणि कोणताही तक्रारदार त्यांच्या दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नसे. एका इंग्रजाने तर आपलं पाकिट तपासा असे आदेश दिला होता. इतरांना मदत करणं हीच जगाची गुरूकिल्ली आहे अशी साईबाबांची शिकवण होती.
चौथी शिकवण म्हणजे सेवाधर्म. साईबाबांबद्दल असं म्हटलं जातं की ते सेवेपासून कधीही दूर पळाले नाहीत त्यांनी शक्य तितकी सेवा केली आणि आपल्या भक्तांना पण सेवा करण्यास प्रेरित केलं. त्या काळात साईबाबांनी आपल्या भक्तांसोबत विविध संकटांच्या वेळी लोकांच्या सेवेसाठी स्वयंसेवा केली. त्यांनी केवळ आपल्या भक्तांना सेवेचा उद्देश केला नाही तर स्वतः सेवाकरून एक आदर्शही घालून दिला.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गरजूंची मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे आणि निःस्वार्थ सेवा करणे हीच खरी पूजा आहे.
Ans: अहंकाराचा त्याग करून नम्रता, साधेपणा आणि प्रेमाने वागावे, असे साईबाबांनी सांगितले.
Ans: साईबाबांच्या मते, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे आणि सत्कर्म करणे हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे.