
फोटो सौजन्य- pinterest
साईबाबांच्या जीवनात अनेक चमत्कारिक घटना घडल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे “पाण्याने दिवे पेटवण्याची” लीला. ही घटना केवळ चमत्कार म्हणून पाहिली जात नाही, तर त्यामागे श्रद्धा, विश्वास, नम्रता आणि अहंकाराचा त्याग यांची मोठी शिकवण दडलेली आहे.
साईबाबा हे कोणत्या एका धर्माचे नव्हते. त्यांनी कधीच आपली जात किंवा कूळ सांगितले नाही. ते कायम गरजूंना मदत करत आले ते कोण साधे पुरुष नाही तर त्यांच्यात एक दैवी शक्ती आहे हे एव्हाना शिर्डीतील गावकऱ्यांना साईंच्या लिलांमधून कळलं होतं. मात्र तरीही काही अहंकारी माणसांनी साईंची परीक्षा घेईचं ठरवलं.
एकदा असं झालं की, द्वारकामाईमध्ये दिवे पेटवण्यासाठी तेलचं उरलं नाही म्हणून साईंनाथ दुकानात गेले. असे एक दुकान म्हणता म्हणता साईनाथांनी शिर्डीतील सगळी दुकानं पालथी घातली पण एकाही दुकानदाराने त्यांना तेल दिलं नाही. मग साईंनी त्यांची लिला दाखवली. साईबाबांनी विहिरीतून पाणी काढलं आणि ते पाणी पणत्यांमध्ये भरलं. त्यावेळी द्वारकामाई जवळ पूर्ण गाव जमा झालं. पाण्याने हे दिवे कसे पेटणार हा प्रश्न प्रत्येकाला पडला. पण साईनाथांनी ते करून दाखवलं.
पाण्याने दिवे पेटले आणि हा चमत्कार पाहून अहंकार असलेले सर्व दुकानदार साईंच्या चरणी आले. आपल्या चुकीची त्यांनी माफी मागितली. तेव्हा साईबाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलं. या गोष्टीचं तात्पर्य काय तर अहंकार हा माणसाचा नाश करतो. तसेच कोणती तरी वाईट परिस्थिती येते असं वाटतं आता काहीच होऊ शकतं नाही. त्यावेळी माणसाने ठरवलं तर परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. देव मंदिरात नाही तर तुमच्या मनामध्ये वास करत असतो.
साईबाबांच्या या लीलाकडे भक्त केवळ चमत्कार म्हणून पाहत नाहीत, तर ती श्रद्धा, नम्रता आणि मानवतेचा संदेश देणारी घटना मानतात. म्हणूनच आजही लाखो भक्त साईबाबांच्या शिकवणीचे पालन करत श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक कथेनुसार, शिर्डीतील दुकानदारांनी तेल देण्यास नकार दिल्यानंतर साईबाबांनी पणत्यांमध्ये पाणी भरून दिवे प्रज्वलित केले आणि ते रात्रभर पेटत राहिले.
Ans: या लीलामधून त्यांनी अहंकाराचा त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश दिला
Ans: काही अहंकारी दुकानदारांनी साईबाबांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांना तेल देण्यास नकार दिला होता.