Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba: साईबाबांनी पाण्याने दिवे कसे पेटवले? जाणून घेऊया त्यांनी दिलेली मोलाची शिकवण

शिर्डीचे साईबाबा हे श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचा संदेश देणारे महान संत मानले जातात. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक घटना घडल्याच्या कथा भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे “पाण्याने दिवे पेटवण्याचा” प्रसंग.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 28, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • साईबाबांनी पाण्याने दिवे कसे पेटवले
  • वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढावा
  • साईबाबांनी दिलेली मोलाची शिकवण
 

साईबाबांच्या जीवनात अनेक चमत्कारिक घटना घडल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे “पाण्याने दिवे पेटवण्याची” लीला. ही घटना केवळ चमत्कार म्हणून पाहिली जात नाही, तर त्यामागे श्रद्धा, विश्वास, नम्रता आणि अहंकाराचा त्याग यांची मोठी शिकवण दडलेली आहे.

जात, धर्म किंवा कूळ यापेक्षा मानवतेला अधिक महत्त्व

साईबाबा हे कोणत्या एका धर्माचे नव्हते. त्यांनी कधीच आपली जात किंवा कूळ सांगितले नाही. ते कायम गरजूंना मदत करत आले ते कोण साधे पुरुष नाही तर त्यांच्यात एक दैवी शक्ती आहे हे एव्हाना शिर्डीतील गावकऱ्यांना साईंच्या लिलांमधून कळलं होतं. मात्र तरीही काही अहंकारी माणसांनी साईंची परीक्षा घेईचं ठरवलं.

Sai Baba: साईबाबा शिर्डीत कसे आले? जाणून घ्या साईबाबांच्या द्वारकामाईचे महत्त्व

अहंकारी लोकांनी मात्र साईबाबांची परीक्षा घेण्याचे ठरवले

एकदा असं झालं की, द्वारकामाईमध्ये दिवे पेटवण्यासाठी तेलचं उरलं नाही म्हणून साईंनाथ दुकानात गेले. असे एक दुकान म्हणता म्हणता साईनाथांनी शिर्डीतील सगळी दुकानं पालथी घातली पण एकाही दुकानदाराने त्यांना तेल दिलं नाही. मग साईंनी त्यांची लिला दाखवली. साईबाबांनी विहिरीतून पाणी काढलं आणि ते पाणी पणत्यांमध्ये भरलं. त्यावेळी द्वारकामाई जवळ पूर्ण गाव जमा झालं. पाण्याने हे दिवे कसे पेटणार हा प्रश्न प्रत्येकाला पडला. पण साईनाथांनी ते करून दाखवलं.

चमत्कार पाहून दुकानदारांना आपल्या चुकीची जाणीव

पाण्याने दिवे पेटले आणि हा चमत्कार पाहून अहंकार असलेले सर्व दुकानदार साईंच्या चरणी आले. आपल्या चुकीची त्यांनी माफी मागितली. तेव्हा साईबाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलं. या गोष्टीचं तात्पर्य काय तर अहंकार हा माणसाचा नाश करतो. तसेच कोणती तरी वाईट परिस्थिती येते असं वाटतं आता काहीच होऊ शकतं नाही. त्यावेळी माणसाने ठरवलं तर परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. देव मंदिरात नाही तर तुमच्या मनामध्ये वास करत असतो.

Sai Baba: दैवी पुरुष असूनदेखील साईबाबा भिक्षा का मागायचे? काय आहे त्यांची शिकवण

आजही प्रेरणा देणारी साईंची लीला

साईबाबांच्या या लीलाकडे भक्त केवळ चमत्कार म्हणून पाहत नाहीत, तर ती श्रद्धा, नम्रता आणि मानवतेचा संदेश देणारी घटना मानतात. म्हणूनच आजही लाखो भक्त साईबाबांच्या शिकवणीचे पालन करत श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबांनी पाण्याने दिवे कसे पेटवले?

    Ans: धार्मिक कथेनुसार, शिर्डीतील दुकानदारांनी तेल देण्यास नकार दिल्यानंतर साईबाबांनी पणत्यांमध्ये पाणी भरून दिवे प्रज्वलित केले आणि ते रात्रभर पेटत राहिले.

  • Que: साईबाबांनी हा चमत्कार का दाखवला?

    Ans: या लीलामधून त्यांनी अहंकाराचा त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश दिला

  • Que: दुकानदारांनी साईबाबांना तेल का दिले नाही?

    Ans: काही अहंकारी दुकानदारांनी साईबाबांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांना तेल देण्यास नकार दिला होता.

Web Title: Sai baba teachings on how to light lamps with water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • hindu religion

संबंधित बातम्या

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
1

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व
3

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
4

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.