Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर्थ रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक”: एका रात्रीत घडलेली अद्भुत काव्यनिर्मिती, जाणून घ्या प्रेरणादायी कथा

समर्थ रामदास स्वामी यांनी 'मनाचे श्लोक' (ज्याला 'मनोबोध' असेही म्हणतात) समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, मनावर ताबा मिळवण्यास शिकवण्यासाठी आणि भक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी लिहिले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 30, 2026 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • समर्थ रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक
  • एका रात्रीत घडलेली अद्भुत काव्यनिर्मिती
  • समर्थ रामदास स्वामींची प्रेरणादायी कथा
 

 

मानवी मनावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच चंचल असलेले मन चुकीच्या मार्गाला जाऊ नये. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिले? तर मनाला सन्मार्गावर (चांगल्या मार्गावर) आणण्यासाठी हे श्लोक मार्गदर्शन करतात. ‘मनाचे श्लोक’ मानवाला आत्मपरीक्षण करायला शिकवतात, ज्यामुळे व्यक्तीतील दोष नाहीसे होतात. तसेच हे श्लोक मनातील दुष्ट वासना, क्रोध, लोभ, मत्सर दूर करून श्रीरामभक्ती आणि सदाचार शिकवतात. हे श्लोक मानवाला नीतिमान जीवन जगण्याची प्रेरणा देतात, जेणेकरून देह त्यागताना कीर्ती मागे उरावी.

Vaishakh Purnima 2026: वैशाख पौर्णिमेचे काय आहे धार्मिक महत्त्व, हे व्रत पाळल्याने कोणते होतात फायदे

एका रात्रीत कोणी लिहिले?

समर्थ रामदास स्वामी हे २०५ श्लोक समर्थ रामदास स्वामींनी स्वतः रचले. असे मानले जाते की, समर्थ रामदास स्वामींनी चाफळच्या खोऱ्यात (किंवा काही ठिकाणी रामघरी असाही उल्लेख आढळतो) असताना, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका रात्रीत हे २०५ श्लोक सांगितले. हे त्यांच्या प्रचंड प्रतिभेचे आणि रामभक्तीचे उदाहरण मानले जाते.

थोडक्यात सांगाचे तर, समर्थ रामदास स्वामी यांच्या “मनाचे श्लोक” या काव्यनिर्मितीभोवती एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा सांगितली जाते. समर्थांनी एका बैठकीत, एका रात्रीत २०५ श्लोक सांगितले. ही केवळ दंतकथा नसून त्यांच्या प्रतिभेचा आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा प्रत्यय देणारी घटना मानली जाते. समर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यापक आवाका पाहता, अशी निर्मिती प्रत्यक्षात घडली असावी, असे मानणे अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.

Adhik Maas: अधिक मास म्हणजे नेमकं काय? या दिवसात दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या

ऐतिहासिक पार्श्वभूमी : चाफळचा केंद्रबिंदू

१२ वर्षांची पायी तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण पूर्ण करून समर्थ चाफळच्या खोर्‍यात स्थिरावले. तेथून त्यांनी समाजजागृतीचे कार्य सुरू केले. त्याला कारण तत्कालीन परिस्थिती होती. मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राला विळखा घातला होता. अत्याचार, लुटमार आणि धर्मावर आक्रमण होत होते.. अशा स्थितीत बलशाली पिढी घडविण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यानंतर १६४४ नंतर ठिकठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना करून समाजात बलोपासना आणि संघटनशक्ती रुजवली. रामभक्तीला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी रामोत्सवाची परंपरा सुरू केली. मसूर येथे पहिला रामजन्मोत्सव साजरा झाला आणि नंतर चाफळ येथे श्रीराम मंदिर उभारण्यात आले. त्या काळात परकीय सत्तेखाली मंदिरनिर्मिती करणे हे धाडसाचे काम होते. पण समर्थांनी ते कृतीतून सिद्ध केले.

संकटाचा प्रसंग आणि “मनाचे श्लोक” यांची निर्मिती

श्लोकचा श्रीगणेशा

समर्थांनी कल्याणस्वामी यांना बोलावले आणि “गणाधीश तो ईश सर्वागुणांचा…” या ओळीपासून श्लोक सांगण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत अखंड काव्यप्रवाह चालू राहिला आणि “म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी” या ओळीने तो पूर्ण झाला. समर्थांनी एका बैठकीत, एका रात्रीत २०५ श्लोक सांगितले.

मनाचे श्लोक हे कालातित आहेत.‌ आजही ते मानवाला प्रसंगानुरूप अंतर्मुख करतात.. त्यांच्या पठणाने जगण्याची एक नवी दिशा सापडते. अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत, सुस्पष्ट असल्याने सर्वसामान्य लोकांना सहज वाचता येतात. त्यामुळेच मनाचे श्लोकांचे महत्त्व इतक्या वर्षांनी कालबाह्य होत नाहीत.‌

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनाचे श्लोक म्हणजे काय?

    Ans: मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले २०५ उपदेशात्मक श्लोक आहेत, जे मनाला योग्य मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करतात.

  • Que: मनाचे श्लोक का लिहिले गेले?

    Ans: मानवी मन चंचल असते. ते चुकीच्या मार्गावर जाऊ नये आणि सन्मार्गावर राहावे यासाठी समर्थांनी हे श्लोक लिहिले.

  • Que: हे श्लोक एका रात्रीत लिहिले गेले का?

    Ans: हो, परंपरेनुसार असे मानले जाते की समर्थ रामदास स्वामींनी एका रात्रीत २०५ श्लोक सांगितले आणि ते त्यांच्या शिष्यांनी लिहून घेतले.

Web Title: Samarth ramdas swami manache shlok inspirational story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
4

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.