
फोटो सौजन्य- pinterest
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन) हा मुख्यतः हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आज शुक्रवार, 20 मार्च रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. ज्या दिवशी विशेष उत्सव आणि पारायण आयोजित केले जातात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच सांगतात. या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया
खरं तरं स्वामी समर्थ महाराज कधी प्रकटले, त्याचा जन्म कधी झाला? यावर ठोस माहिती नाही आहे, पण अनेक कथांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, श्री स्वामी महाराजांना अवतार पंजाब प्रांतातील हास्तिनापुरापासून 24 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या छेली खेडा नावाच्या गावामध्ये एका वटवृक्षाखाली झाला होता असं सांगण्यात येतं. तर काहीजण असं म्हणतात की, स्वामी समर्थ कर्दळीच्या वनातून प्रकट झाले.
श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम जवळील घनदाट कद वनातून प्रकट झाले असं देखील सांगण्यात येतं. कदही वनात तपश्चर्या करत असताना एका लाकूड तोड्याचा घाव चुकून त्यांच्या मांडीवर लागला आणि त्यानंतर स्वामी प्रकट झाले. या पवित्र ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादूका आहेत, असं म्हटलं जातं.
जाणकाराच्या माहितीनुसार, 1856 मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात पहिल्यांदा स्वामीचं दर्शन झालं होतं. त्यांनी मंगळवेढामधून पहिल्यांदा अकक्लकोट नगरीमध्ये प्रवेश केला होता, असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर ते खंडोबाच्या मंदिरात मुक्कामासाठी राहिले होते. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री स्वामी समर्थांनी भगवान दत्तात्रेयाचं तिसरं रुप घेतलं असं मानलं जातं. अगदी आजच्या काळात देखील स्वामींना मानणारा आणि त्यांच्यावर श्रद्धा असणारा समुदाय फार मोठा आहे.
प्रकट दिनाचे महत्त्व
स्वामी समर्थ प्रकट दिन हा त्यांच्या अवतरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त स्वामींची विशेष पूजा, आरती आणि नामस्मरण करतात. “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप केल्याने मनःशांती, धैर्य आणि संकटातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्याची स्मृती म्हणून साजरा केला जाणारा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी भक्त विशेष पूजा आणि नामस्मरण करतात.
Ans: या दिवशी स्वामींच्या कृपेची विशेष अनुभूती मिळते, अशी श्रद्धा आहे. भक्त या दिवशी प्रार्थना करून मनोकामना पूर्ण होण्याची अपेक्षा करतात.
Ans: जाणकारांच्या मते अक्कलकोट येथे 1856 साली खंडोबा मंदिरात त्यांचे पहिले दर्शन झाले असे मानले जाते.