Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व दिले जाते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी मुख्य दरवाजाबाबत काही नियम पाळण्याची परंपरा आहे. या काळात दरवाजा कसा ठेवावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 19, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद
  • दरवाज्याबाबत वास्तुशास्त्रातील नियम
  • संध्याकाळच्या वेळेस दरवाज्या उघडा ठेवणे शुभ मानले जाते
 

 

 

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाज्याला महत्त्वाचे स्थान मानले जाते. ते केवळ येण्या-जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून काम करत नाही, तर धार्मिक श्रद्धेनुसार ते सकारात्मक ऊर्जा देखील घरात आणते. सूर्यास्ताच्या वेळेस विशेषतः शुभ मानले जाते. त्यामुळे, या काळात मुख्य दरवाजाबाबत काही नियम पाळणे उचित आहे. असे मानले जाते की, संध्याकाळी मुख्य दरवाजा जास्त वेळ बंद ठेवल्याने घरात येणाऱ्या शुभ ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो. संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद, जाणून घ्या

संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद

सनातन धर्मानुसार, संध्याकाळ ही पूजा आणि धार्मिक कार्यांसाठी एक विशेष वेळ मानली जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळच्या वेळी घरात प्रवेश करते. त्यामुळे, या काळात घराचे प्रवेशद्वार स्वच्छ व नीटनेटके ठेवण्याची आणि काही काळासाठी ते उघडे ठेवण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो. दीर्घकाळ दरवाजा बंद ठेवल्याने घरात नकारात्मक वातावरण आणि आर्थिक समस्या निर्माण होतात, असेही मानले जाते. दरम्यान, या धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यता आहेत.

Putrada Ekadashi 2026: 22 की 23 कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी काय करावे

वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी वातावरणात बदल होतो. त्यामुळे, घरात ताजी हवा आणि प्रकाश येण्यासाठी खिडक्या आणि मुख्य दरवाजा थोड्या वेळेसाठी उघडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हलके, शांत आणि सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

Hindu Puja Naivedya: रोज देवाला नैवेद्य दाखवलेच पाहिजे का? काय सांगतं धर्मशास्त्र

मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा

प्राचीन काळापासून संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावण्याची परंपरा चालत आलेली आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, दिव्याचा प्रकाश घरातील अंधार आणि नकारात्मकता दूर करतो आणि देवी लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला स्वच्छ पाणी किंवा गंगाजल शिंपडू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे. दाराजवळ कचरा, विखुरलेले बूट किंवा अनावश्यक वस्तू ठेवणे टाळावे. संध्याकाळी मुख्य दाराजवळ पुरेसा प्रकाश ठेवणे देखील शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, एक स्वच्छ, सुंदर आणि पुरेसा प्रकाश असलेले प्रवेशद्वार घरात सकारात्मकता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यास मदत करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी मुख्य दरवाजा कसा ठेवावा?

    Ans: वास्तुशास्त्रातील काही मान्यतांनुसार संध्याकाळच्या वेळी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवावा. दरवाजा उघडा किंवा बंद ठेवण्यापेक्षा घरात सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण ठेवण्याला महत्त्व दिले जाते.

  • Que: संध्याकाळी मुख्य दरवाजा बंद ठेवणे अशुभ मानले जाते का?

    Ans: काही वास्तु मान्यतांमध्ये संध्याकाळी मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद ठेवणे टाळावे असे सांगितले जाते. मात्र ही धार्मिक किंवा वास्तुशी संबंधित श्रद्धा आहे; याला वैज्ञानिक नियम मानता येत नाही.

  • Que: मुख्य दरवाजाचे वास्तुशास्त्रात इतके महत्त्व का आहे?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वार हे घरात ऊर्जा प्रवेश करण्याचे प्रमुख स्थान मानले जाते. त्यामुळे त्याची स्वच्छता, प्रकाश आणि मोकळी जागा यांना विशेष महत्त्व दिले जाते.

Web Title: Vastu tips should the main door be kept open or closed in the evening vastu rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.