
फोटो सौजन्य- chatgpt
ज्योतिबाला दिवसभरात वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. पण श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे दरवर्षी महाशिवरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या काळात लाखो भाविकांच्या उपस्थितीत डोंगवरावरती खिचडीचा सण साजरा होतो. या काळात भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात आणि डोंगरावरती येऊन खिचडी बनवून देवाला अर्पण करतात. खिचडी अर्पण करण्याची परंपरा जाणून घेऊया
श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. अनेक भाविक आपली नवस्मृती म्हणून किंवा परंपरेनुसार डोंगरावरती खिचडीचा प्रसाद तयार करतात. सामुदायिक पद्धतीने ही खिचडी बनवली जाते. डोंगरावरील मोकळ्या जागी एकत्र येऊन तांदूळ, डाळ आणि विविध भाज्या या साहित्यांचा वापर करून चुलीवरती खिचडी बनवली जाते. तयार झालेली खिचडी प्रथम ज्योतिबा देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जाते. त्यानंतर भाविक हा प्रसाद ग्रहण करतात. विशेष म्हणजे भाविकांची कितीही गर्दी असली तरी एकही भाविक या प्रसादाशिवाय जात नाही.
ज्योतिबा हा केदारनाथचा अवतार मानला जातो आणि महाशिवरात्रीच्या काळात किंवा पौर्णिमेला डोंगरावर राहून नैवेद्य दाखवण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. ज्योतिबा मंदिरात प्रत्येक रविवार, पौर्णिमा आणि चैत्र यात्रेच्या दिवशी खिचडी तयार केली जाते. याशिवाय काही जण नवस पूर्ण झाल्यावरती तर काही जण घरून देखील खिचडी बनवून आणतात. पण इथे ही खिचडी मंदिराच्या आवारातच बनवली जाते.
लोकश्रद्धेनुसार खिचडीचा हा प्रसाद साधेपणा आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य देणं ही कृती, परंपरा आणि कृतज्ञतेचे सुंदर धार्मिक पद्धत मानली जाते.
तयार खिचडी प्रथम ज्योतिबा देवाला अर्पण केली जाते. त्यानंतर ती प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटली जाते. लोकश्रद्धेनुसार या प्रसादाचे सेवन केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि देवाची कृपा प्राप्त होते.
चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो. गुलालाची उधळण, जयघोष आणि धार्मिक वातावरणात खिचडी प्रसादाची परंपरा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: लोकश्रद्धेनुसार खिचडी हा सात्विक आणि साधेपणाचे प्रतीक असलेला प्रसाद मानला जातो. भक्तिभावाने अर्पण केलेली खिचडी देवाला प्रिय मानली जाते.
Ans: चैत्र पौर्णिमा यात्रा, प्रत्येक पौर्णिमा, रविवार आणि महाशिवरात्रीच्या काळात खिचडीचा नैवेद्य विशेष केला जातो.
Ans: हा प्रसाद साधेपणा, सात्विकता, समानता आणि अन्नदानाची भावना दर्शवतो.